Headlines

वृक्षारोपण अभियानामधून‎राहात्याचा होणार कायापालट‎:"साईयोग''च्या पुढाकारातून खटकळी येथे वृक्षारोपण‎

प्रतिनिधी | राहाता येथील डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे साईयोग फाउंडेशनद्वारे राहाता व परिसरात गेल्या १७ वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणार्थ गेल्या ९ वर्षांपासून वृक्षारोपण अभियान अंतर्गत हजारो वृक्षांची लागवड करून संवर्धनही केले आहे. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते खटकळी परिसर येथे १२ फुटी वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी…

Read More

विकास लवांडे हल्ला प्रकरण: गंभीर कलमे वाढवण्यासाठी अर्ज:पूर्वनियोजित हल्ल्याचा दावा, 14 मे रोजी आदेश अपेक्षित

प्रवचनकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात हल्ल्यातील गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमे वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश ए. एस. बागल यांच्या न्यायालयात मंगळवारी हा अर्ज ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी दाखल केला. न्यायालयाने अर्ज विचारात घेतला असून,…

Read More

जय श्रीराम म्हणत महागाई सहन करा:संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले- आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिक त्रस्त झाले असताना सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असताना देशातील नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात असल्याचे राऊत म्हणाले. जनतेला गरीब व्हावं लागेल आणि…

Read More

तरुणाईला मोबाईलपासून दूर करून वाचन संस्कृती रुजवणारी संमेलने काळाची गरज:शब्दगंध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री भरणे यांचे प्रतिपादन‎

आपली मराठी भाषा, आपले साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. अलीकडच्या काळात तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये कमालीची व्यस्त झाली आहे. या पिढीला तंत्रज्ञानाच्या कचाट्यातून बाहेर काढून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशी संमेलने गरजेची आहेत, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केले. शब्दगंध…

Read More

अभिनेता राम चरण म्हणाला- मी कठोर वडील:मुलांना धोका पत्करणे आणि मातीत खेळायला शिकवतो, पत्नी उपासना घरात काळजी घेणारी भूमिका बजावते

साऊथ अभिनेता राम चरण सध्या त्यांच्या व्यावसायिक जीवनासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी त्यांच्या पालकत्वाच्या शैलीबद्दल म्हणजेच मुलांना वाढवण्याच्या पद्धतीबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. तीन मुलांचे वडील राम चरण यांनी स्वतःला एक ‘रफ’ (एका अर्थाने कठोर) वडील म्हटले आहे. त्यांचे मत आहे की मुलांना लहानपणापासूनच आव्हानांना सामोरे जाणे आणि जोखीम पत्करणे शिकले पाहिजे. अभिनेता मुलांना जोखीम…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस: भारत 'विश्वगुरू' बनेल:आध्यात्मिक महासत्ता होण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याचे स्वप्न केवळ आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्यावर आधारित नाही, तर ते आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशात रुजलेले आहे. भारताला आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रशस्त होत आहे, असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग…

Read More

20 अपघातग्रस्तांच्या वारसांना 40 लाख‎:ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही‎

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेतून मयत शेतकऱ्याच्या पत्नीला दोन लाख अनुदान मंजुरीचे पत्र देतांना इगतपुरी कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी किशोर भरते. शेती करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात व अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. यामुळे कुटुंबाचे आर्थिक साधन बंद होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला…

Read More

इम्तियाज यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल:कचरा हस्तांतरण केंद्रावरील काम रोखणे भोवले

एन-१२ भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर काम थांबवल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनपा मार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या वेस्टर्न इमर्जनरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी विशाल विलासराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या…

Read More

मराठी सक्तीची भाषा असताना हिंदीची परीक्षा कशासाठी?:दिल्लीतल्या भैय्यांना खूश करण्यासाठी घाट? महाराष्ट्रात हिंदीचं आक्रमण खपवून घेणार नाही- संदीप देशपांडे

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याचे सरकारने उत्तर दिले पाहिजे. त्यांना मराठी भाषा येणं अपेक्षित आहे.पडद्याआडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. सरकारने ही परीक्षा रद्द करावी अन्यथा परीक्षा केंद्राबाहेर जो राडा होईल त्यासाठी सरकार जबाबदार असेल, असा इशारा…

Read More

10 कोटीतून ‘हत्ती तलावा’ला येणार नयनरम्य पर्यटन केंद्राचे रूपडं:संगीतमय कारंजे, बोटिंग, स्वच्छता आणि नयनरम्य उद्यानामुळे अक्कलकोटच्या वैभवात पडणार भर‎

. अक्कलकोट संस्थानाच्या काळातील हत्तीखाना व तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अक्कलकोटमधील ऐतिहासिक हत्ती तलावाच्या मजबुतीकरण आणि सुशोभीकरणासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, ज्यामुळे हे स्थळ आकर्षक पर्यटन केंद्र बनेल. या प्रकल्पात संगीत कारंजे, स्वच्छता आणि परिसराचा विकास या कामांचा समावेश आहे. अक्कलकोटकरांच्या आणि स्वामीभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ऐतिहासिक…

Read More