‘सिबिल’ची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप:‘एल निनो’च्या संकटात बळीराजाला सरकारचा दिलासा
यंदा महाराष्ट्रातील १५२ लाख हेक्टर खरीप हंगामावर ‘एल निनो’चे मोठे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीच्या अवघा ८८% पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज असताना, पीक कर्ज देण्यात बँकांकडून होणाऱ्या दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या (एसएलबीसी) बैठकीत तीव्र…