Headlines

कापूस पिकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील:राज्यस्तर राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा‎




‘कापूस हे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख पीक असून, कापसाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शेतकरी मार्गदर्शनातून उत्पादनवाढ साध्य केली जाईल,’ असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे. ते पुसदा येथे आयोजित कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा, राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. हा कार्यक्रम २२ मे रोजी पुसदा येथे झाला. या कार्यक्रमाला धनंजय धवड, पौर्णिमा सवाई, डॉ. दिलीप काळे, अविनाश पांडे, प्रशांत गुल्हाने, अभय महल्ले, काशिनाथ फुटाणे, प्रशांत डहाणे, भय्यासाहेब निचळ, अरुण शिंदे, हर्षल ठाकूर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला कापूस उत्पादक शेतकरी कार्यशाळा, राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. हा कार्यक्रम राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान व आत्मा कृषी विभाग, अमरावती यांच्या संयुक्त सहकार्याने घेण्यात आला होता. कापूस उत्पादन क्षेत्रात व शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान यावेळी केला . या वेळी राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार देऊन विक्रमी कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांमध्ये युसुफ मुल्ला खलील मुल्ला, अनिल कडू, भास्करराव हिरगोळे आणि भाऊराव कोरडकर यांचा समावेश होता. गुणवंत कोकरे यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून विशेष सन्मान केला.याचवेळी कापूस तज्ज्ञ हर्षल ठाकूर यांनी कापूस पिकाचे नियोजन, योग्य पेरणी, पीक व्यवस्थापन, रोगनियंत्रण, उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तर राजाभाऊ पाटील यांनी एसआरटी संदर्भातील माहिती देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवलंबण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक मोहोड, चौधरी, कृषी अधिकारी देशमुख, ज्ञानेश्वर टिपरे, अक्षय साबळे, सुमंत पुसदेकर, दिलीप हटवार, योगेश बोबडे, यश रुद्रकार आदींनी विशेष परिश्रम घेतले. शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत आणि उत्पादनक्षम शेतीकडे प्रेरित करणारा हा कार्यक्रम कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा ठरला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *