![]()
अहिल्यानगर गणेशोत्सवाच्या उत्साहात भक्तीबरोबरच सामाजिक जनजागृतीचा संदेश देत महाराणी ताराबाई कन्या विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी गीतातून स्वच्छतेचा जागर केला. विद्यार्थिनींनी समूहगीत सादर करून गणेशोत्सव काळात परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, कचरा रस्त्यावर न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच उत्सवानंतर परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे, असा संदेश विद्यार्थिनींनी गीतातून दिला. त्यांच्या सुरेल सादरीकरणातून स्वच्छतेचे महत्त्व सहज आणि प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थिनींच्या या उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवासारख्या उत्सवातून केवळ मनोरंजन न करता सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न विद्यार्थिनींनी केला. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या दृष्टीने अशा उपक्रमांना महत्त्व आहे. ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ हा संदेश देत विद्यार्थिनींनी गणेशोत्सवाच्या आनंदाला सामाजिक जाणीवेची जोड दिली. समूहगीत सादर करूनविद्यार्थिनींनी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
Source link
गणरायाच्या मंडपातूनउमटला स्वच्छतेचा स्वर:महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा उपक्रम