![]()
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याअध्यक्षपदासाठी शिंदेसेनेकडून आमदारविलास भुमरे व उपाध्यक्षपदासाठी भाजपचेदिनेश परदेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तबकरण्यात आले आहे, अशी माहितीविश्वसनीय सूत्रांनी दिली. सोमवारी बँकेच्यासंचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष
.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारीमॅरेथॉन बैठका झाल्या. त्यानंतर रविवारीपालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसीविकास मंत्री अतुल सावे यांच्या घरीही बैठकाझाल्या. अध्यक्ष, उपाध्यक्षपदांबाबतबैठकांमध्ये घेतलेला निर्णय मुंबईत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वसुनेत्रा पवार यांना कळवण्यात आला. अध्यक्ष,उपाध्यक्षांची नावे व दोन्ही पदांच्या वाटपाबाबतठरलेल्या सूत्रावर तिन्ही नेत्यांनी शिक्कामोर्तबकेल्याचे सूत्रांनी सांगितले.
बँकेच्या सर्व संचालकांना बैठकीचे दिले निमंत्रण
सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारीबँकेची बैठक आहे. यामध्येसंचालकांच्या बैठकीत अध्यक्ष आणिउपाध्यक्ष निवडला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व संचालकांनाखासदार भुमरे यांच्या माध्यमातूननिमंत्रण देण्यात आले. दिनेश परदेशीयांच्या माध्यमातून भाजपसंचालकांना सकाळी उपस्थितराहण्यासंदर्भात फोन केल्याचीमाहिती सूत्रांनी दिली आहे.
चौथे वर्ष ठरेल महत्त्वाचे
शिंदेसेनेला २०२६ व २०२७ याकालावधीत अध्यक्षपद दिलेआहे. २०२९मध्ये लोकसभा,विधानसभा निवडणुका होणारआहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचेचौथे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे.विशेष: लोकसभा मतदारसंघावरबँकेच्या अध्यक्षांचा प्रभावअसतो. त्यामुळे निवडणुकीवेळीअध्यक्षपदी आपल्याकडे राहिलेपाहिजे, यासाठी भाजपचा प्रयत्नराहणार आहे.
बिनविरोध अध्यक्ष होणार
महायुतीतील तिन्ही पक्षाच्या बैठकादिवसभर झाल्या. महायुतीचाच अध्यक्षव्हावा आणि बिनविरोध व्हावा यासाठीआमचा प्रयत्न होता. त्यानुसारबिनविरोध अध्यक्ष निवडला जाईल. – सतीश चव्हाण, आमदार, राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष
शिवसेनेचा अध्यक्ष ठरला
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत २वर्षे शिवसेना, २ वर्षे भाजप आणि १ वर्षराष्ट्रवादी काँग्रेस असा फॉर्म्यूला ठरला आहे.पहिल्यांदा शिवसेनेचा अध्यक्ष होणार आहे.सर्वासोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यातआला आहे. – संजय शिरसाट, पालकमंत्री
खासदार संदिपान भुमरे यांनी सांभाळली शिवसेनेची सर्व सूत्रे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची सूत्रे खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे दिली होती. पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून शिवसेनेने एकत्र येत ही निवडणूक लढवली.मनपा आणि जिल्हा परिषदेत बसलेल्या धक्क्यानंतर शिवसेनेकडून पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढविली. अध्यक्षपदासाठी संख्याबळाचे गणित अडचणीचे ठरू शकते हे लक्षात घेत जागा जास्त लढवल्या. भाजपची सूत्रे मंत्री अतुल सावे यांच्याकडे होती .