![]()
पाथर्डी तालुक्यातील जुने मोहटे येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, यामुळे परिसरातील सुमारे १५० हेक्टर शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. आमदार मोनिका राजळे यांनी या कामासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळात या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावातून प्रसिद्ध श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान आणि रेणुका विद्यालयाला पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तलावाच्या भिंतीला मोठी गळती लागल्याने पावसाळ्यातील पाणी उन्हाळ्यापर्यंत टिकत नव्हते. त्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती. सध्या तलावाच्या भिंतीवरील झाडे-झुडपे काढून अत्याधुनिक पद्धतीने प्लास्टिक अंथरण्याचे काम सुरू आहे. यानंतर मातीचा भराव व दगडी पिचिंग (दगडी अस्तरीकरण) करून गळती पूर्णपणे रोखली जाईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. पाणी वर्षभर टिकणार ^ जुने मोहटे तलावाचे अस्तरीकरण केल्यामुळे तलावाची होणारी गळती थांबणार आहे. यापूर्वी पावसाळ्यात तलावात पाणी आल्यानंतर गळतीचे प्रमाण मोठे होते.त्यामुळे पाणी टिकत नव्हते. मात्र,आता तलावातील गाळ देखील मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे.तसेच तलावाचे अस्तरीकरण करण्यात आल्यामुळे पाण्याची होणारी गळती थांबणार आहे. त्यामुळे पाणी वर्षभर टिकेल याचा फायदा माझ्यासह परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. पाणी वर्षभर टिकले तर पिकेदेखील वेगवेगळे घेता येतील. – माणिक दहिफळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार गेल्या वीस दिवसांपासून हे काम अहोरात्र सुरू आहे. तलाव दुरुस्तीमुळे पाणी साठवण क्षमता वाढेल आणि उन्हाळ्यातील टंचाई दूर होईल. आमदारांनी ५० लाखांचा निधी देऊन मोहटादेवी परिसराचा पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न सोडवला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्ते शिवाजी दहिफळे यांनी दिली. शेती उत्पन्नात होणार वाढ ^ तलावातील गाळ काढल्यामुळे तलावाच्या पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ होणार आहे.याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार असून शेती उत्पादनात देखील वाढ होणार आहे.तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास देखील मदत होणार आहे. – शिवाजी दहिफळे.
Source link
मोहटे पाझर तलावाची थांबणार गळती:पाथर्डीतील 150 हेक्टर शेतीचा प्रश्न मार्गी, 50 लाखांचा निधी मंजूर