‘भारत’ लिहिलेल्या 21 हजार तिळांद्वारे साकारला विठ्ठल:पंढरपुरात दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा शुभारंभ; सूक्ष्म कलाकृती व चित्रनिर्मितीने रसिक मंत्रमुग्ध
सावळ्या विठुरायाच्या नगरीत आजपासून तीन दिवसीय दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात शुभारंभ झाला. राज्यभरातील अक्षरप्रेमी कलावंत, साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीने श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संमेलन परिसर गजबजून गेला आहे . या संमेलनाला पहिल्याच दिवशी पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांनी, तसेच लांबून आलेल्या विठ्ठल भक्तांनी व कलाप्रेमींनी मोठी गर्दी केली. विद्यार्थ्यांसह अक्षरप्रेमी नागरिक, महिला, तरुण…