Headlines

हिंगोलीत लाचखोर भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात:मोजणीची सीट देण्यासाठी स्वीकारली 10 हजारांची लाच

हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शेतकऱ्याला शेती मोजणीची सीट देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतांना उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील दोन भुकरमापकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. २२ दुपारी रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बासंबा येथील एका शेतकऱ्याने…

Read More

व्हेनेझुएला भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला:सौदी-अमेरिका मागे पडले; होर्मुझ बंद झाल्यानंतर भारतीय कंपन्यांनी खरेदी वाढवली

होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे. अशा वेळी जेव्हा मध्य पूर्वेकडील देशांच्या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला, तेव्हा व्हेनेझुएला अचानक भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. एनर्जी ट्रॅकिंग डेटा केप्लरनुसार, व्हेनेझुएलाने मे २०२६ मध्ये सौदी अरेबिया आणि अमेरिका या दोघांनाही मागे टाकले आहे. सध्या केवळ रशिया आणि…

Read More

NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई:पुण्यातून आणखी एका 'मनीषा'ला अटक; भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याचा आरोप

देशभर गाजत असलेल्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, या प्रकरणातील एका नव्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याप्रकरणी मनीषा संजय हवालदार या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या असून, या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे पेपरफुटीच्या या मोठ्या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील सेठ हिरालाल सर्फ…

Read More

SC ने म्हटले- आई-वडील IAS असतील, तर मुलांना आरक्षण का?:क्रीमी लेयरची मुले आरक्षण घेत राहिली तर यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीत

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारी नोकरीत क्रीमी लेयरमधील उमेदवारांना आरक्षण घेण्यावर चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर त्यांच्या मुलांना आरक्षण का मिळावे? शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक गतिशीलताही येते. अशा परिस्थितीत जर संपन्न मुलांसाठी पुन्हा आरक्षण मागितले गेले, तर आपण या चक्रातून कधीही बाहेर पडू शकणार नाही. न्यायमूर्ती बी.व्ही….

Read More

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र?:एकाच हॉटेलमध्ये अन् एकाच टेबलवर बसून घेतला चहाचा आस्वाद; अनेकांच्या भुवया उंचावल्या

एकेकाळी ऊस आंदोलनाच्या मैदानात खांद्याला खांदा लावून लढणारे, मात्र नंतरच्या काळात राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दुरावलेले दोन मोठे नेते अनेक वर्षांनंतर जाहीरपणे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इंदापूर न्यायालयाच्या आवारात एकत्र येत चहाचा आस्वाद घेतला. गेल्या काही वर्षांत या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये मोठे…

Read More

पंढरपूरमध्ये खासदार धनंजय महाडिकांवरील पोस्टवरून राडा:सुस्ते गावात दोन गटांत फ्री-स्टाईल हाणामारी! परिसरात दहशतीचे वातावरण

पंढरपूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमातील राड्याची घटना ताजी असतानाच आता सुस्ते गावात दोन गटांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी समाजमाध्यमांवर सुरू असलेली टीका-टिप्पणी आणि त्यातून एकमेकांना दिलेल्या आव्हानांमधून हा वाद पेटला, ज्याचे रूपांतर अखेर एका रक्तरंजित हाणामारीत झाले….

Read More

मनोवृत्तीनुसार देवतांची उपासना भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- शास्त्री महाराज:दगडूशेठ ट्रस्टच्या श्रीगणेश गीतेतील 'भक्तीयोगा' प्रवचनमालेत निरूपण

थेट परब्रह्माची पूजा करणे शक्य नसल्याने विविध माध्यमांची निर्मिती झाली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनोवृत्तीनुसार वेगवेगळ्या देवतांची उपासना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत ते बोलत होते. शास्त्री महाराज म्हणाले की, “इतके देव…

Read More

Young Face Loneliness, 36-45 Age Group Under Most Pressure

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नोकरी आणि करिअरचा ट्रेंड वेगाने बदलत आहे. ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म इप्सोसच्या जनरेशन रिपोर्ट 2026 नुसार, आजच्या काळात नोकरीचे सर्वात मोठे आव्हान फक्त पैसे कमावणे राहिलेले नाही. मानसिक थकवा, सतत उपलब्ध राहण्याचा दबाव, एकटेपणा आणि वैयक्तिक आयुष्यासाठी वेळेचा अभाव या नवीन कार्यसंस्कृतीच्या सर्वात गंभीर समस्या आहेत. या अहवालात कर्मचाऱ्यांच्या कामाच्या…

Read More

सप्टेंबरअखेरपर्यंत पोस्को कोर्ट इमारत बांधकाम पूर्ण करा:टाटा प्रोजेक्ट्सला आदेश, अन्यथा थेट कारवाईचा इशारा

पुणे जिल्हा न्यायालय (शिवाजीनगर) येथील ‘पोस्को’ कोर्ट इमारतीच्या रखडलेल्या बांधकामावरून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी कंत्राटदार कंपनी ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड’ला सक्त ताकीद दिली आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचे आदेश देत, मुदतीत काम न झाल्यास कंत्राट रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शुक्रवारी झालेल्या आढावा…

Read More

पुण्यात 67,956 थकबाकीदारांनी अभय योजना धुडकावली:सजग नागरिक मंचाचा सवाल, महापालिका प्रशासनावर कारवाईचा दबाव

पुणे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबवण्यात आलेल्या अभय योजनेला हजारो सराईत थकबाकीदारांनी धुडकावून लावल्याचे समोर आले आहे. एकूण ६७,९५६ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. या पार्श्वभूमीवर, अशा थकबाकीदारांवर महापालिका प्रशासन नेमकी कधी आणि कोणती कारवाई करणार, असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ मार्च…

Read More