पालघरमध्ये वऱ्हाडींचा ट्रक अन् कंटेनरची धडक:12 जणांचा मृत्यू, 20 ते 25 गंभीर जखमी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त…