Headlines

महालक्ष्मी सरस 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:71 लाख महिलांचा सहभाग, सात दिवसांत 15 कोटींची उलाढाल

२ मे २०२६ पासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीओओ निलेश सागर आणि सीईओ निखिल ओसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. सीओओ निलेश सागर यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट…

Read More

CJI म्हणाले- मला ओरडून चेंबरमधून बाहेर काढले होते:त्याच न्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार न्यायिक सेवा मुलाखत सोडली; हसून विचारले, माझा निर्णय योग्य होता का

सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी सांगितले की, कसे एका न्यायाधीशांनी त्यांना ओरडून चेंबरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. हा किस्सा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायिक सेवेतील अर्जदाराच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितला. मॅजिस्ट्रेट परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी घेऊन प्रेरणा गुप्ता आपले म्हणणे मांडत होत्या, तेव्हाच सरन्यायाधीशांनी…

Read More

दारू प्यायल्याशिवाय झोपू शकत नव्हती नीतू कपूर:ऋषी कपूर यांच्या निधनानंतर मानसिकरित्या खचली, ट्रोलिंगमुळे दुःखी झाली

अभिनेत्री नीतू कपूरने नुकतेच पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतरच्या कठीण काळाबद्दल मोकळेपणाने सांगितले. सोहा अली खानच्या यूट्यूब शोमध्ये बोलताना नीतू यांनी सांगितले की, २०२० मध्ये ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांनी सांगितले की, ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्या अनेक महिने रात्रभर जाग्या राहत होत्या. अनेकदा त्यांना रात्रभर झोप येत नव्हती. हळूहळू…

Read More

पबमध्ये महिलेसोबत आढळल्याने पोलिस हवालदार निलंबित:कोम्बिंग ड्युटीचे खोटे सांगून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी कारवाई

कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये एका महिलेसोबत आढळल्याने एका पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीर वस्ती, वडकी) असे आहे. पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कांबळे यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध…

Read More

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, संकल्प सप्ताहाची सांगता:राज्य थॅलेसेमियामुक्त करूया – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर १ ते ८ मेदरम्यान “संकल्प सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आयएमए हॉल, समर्थनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनजागृती, समाजाचा सहभाग आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हा लढा सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान…

Read More

DMK खासदार लोकसभेत काँग्रेससोबत बसणार नाहीत:अध्यक्षांना पत्र लिहिले, TVK ला पाठिंबा दिल्याने नाराज

तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) ने काँग्रेससोबतची आपली युती संपुष्टात आणली आहे. आता DMK खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून पक्षाच्या खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली आहे. कनिमोझी यांनी पत्रात म्हटले आहे की, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आणि काँग्रेससोबतची युती संपुष्टात आल्यानंतर DMK खासदारांनी…

Read More

लाखो मुंबईकरांसाठी आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना थेट पत्र:सेस-नॉन सेस इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या चार मागण्या

मुंबईतील सेस आणि नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. विशेषतः जुन्या आणि धोकादायक अवस्थेतील इमारतींच्या दुरुस्ती तसेच पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री विशेष निधीतून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी…

Read More

गुजरातमधील 2002 च्या पॅटर्ननुसार देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र:हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप

भारतीय जनता पक्ष २०२९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभर धार्मिक तेढ निर्माण करत असून, २००२ च्या गुजरात दंगलींप्रमाणेच हिंसाचार घडवण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केला. पाच राज्यातील निवडणुकीनंतर काही राज्यांत सुरू झालेला हिंसाचार हा याच मोठ्या कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार…

Read More

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करा:मंत्री संजय शिरसाट यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

सामाजिक न्याय विभागाने समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले. ‘सामाजिक न्याय’ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने लोणावळा येथे आयोजित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी…

Read More

पुण्यातील उद्योजक केपीआयटीचे संस्थापक डॉ. रवी पंडित यांचे निधन:उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली

भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि ‘के अँड पी’ समूहाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. ऊर्फ रवी पंडित यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा चिन्मय, मुलगी प्राची आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा…

Read More