Headlines

अमरावती बारावीचा निकाल 0.96 टक्क्यांनी घसरला:मुलींची आघाडी कायम, तिन्ही शाखांमध्ये अमरावतीची बाजी

अमरावती मंडळाचा बारावीचा निकाल यावर्षी ०.९६ टक्क्यांनी कमी लागला आहे. गेल्यावर्षी ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यावर्षी ही संख्या घसरून ९०.९२ टक्क्यांवर थांबली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले आणि १ लाख ३४ हजार…

Read More

अमरावती जीएमसीची प्रस्तावित जागा वनखात्यात अडकली:प्रशासनासमोर पेच, पर्यायी जागेचा विचार सुरू

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (जीएमसी) अलियाबाद येथील प्रस्तावित जागा वनखात्यात अडकली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या महाविद्यालयासमोर आता जागेचा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनासमोर नव्या जागेचा पर्याय स्वीकारायचा की सध्याच्या जागेचे आरक्षण बदलून घ्यायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीला महसूल आणि वनखात्याचे…

Read More

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शिट्टी वाजवल्याने शाहरुख खान संतापला होता:वानखेडे वादावर माजी एसीपी म्हणाले- मला सांगण्यात आले की शाहरुख गोंधळ घालत होता

२०१२ साली मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या वादावर तत्कालीन एसीपी इक्बाल शेख यांनी नुकतेच सांगितले की, शाहरुख खान आणि एमसीए अधिकाऱ्यांमध्ये गैरसमजातून वाद झाला, तो वाढू नये म्हणून त्यांनी अभिनेत्याला घटनास्थळावरून बाहेर घेऊन जाण्यास सांगितले होते. हे प्रकरण २०१२ च्या आयपीएल सामन्यानंतर समोर आले होते, जेव्हा कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला हरवले होते. सामन्यानंतर मैदानावर शाहरुख…

Read More

अकरावी प्रवेशासाठी 3 फेऱ्या, मुलींसाठी जादा राऊंड:दहावीच्या निकालानंतर नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण, आता पसंतीक्रम

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. लवकरच दहावीचा निकाल लागण्याची शक्यता असल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील शाळा स्तरावरील ऑनलाइन नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण तीन नियमित फेऱ्या होणार असून, मुलींसाठी एक विशेष जादा फेरी निश्चित करण्यात आली आहे. दहावीचा निकाल लागताच…

Read More

अमरावती विभागात बुलडाणा अव्वल:अमरावती जिल्हा 88.26 टक्के निकालासह पिछाडीवर

आज घोषित झालेल्या बारावीच्या निकालात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या जिल्ह्यात ९५.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अमरावती जिल्हा ८८.२६ टक्के निकालासह सर्वात कमी टक्केवारी नोंदवत शेवटच्या स्थानावर राहिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय बोर्डाचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. मंडळाच्या प्रभारी सचिव तथा शिक्षणाधिकारी…

Read More

यावली शहीद गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा:'जय गुरुदेव'च्या निनादात गाव दिव्यांनी उजळले

यावली शहीद (अमरावती): अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव नजीकच्या यावली शहीद गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या या गावात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ‘जय गुरुदेव’च्या निनादात आणि दिव्यांच्या रोषणाईत सोहळ्याला सुरुवात झाली. पहाटे ४ वाजल्यापासून राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा गुरुकुंज येथील गोपाल सालोटकर व त्यांच्या संचाने सादर केला….

Read More

वडिलांच्या जवळ राहण्यासाठी त्रिशालाला बॉलिवूडमध्ये यायचे होते:संजय दत्तच्या सल्ल्यानंतर अभिनय सोडला, आता मानसिक आरोग्य तज्ज्ञ बनली आहे

संजय दत्त यांची मुलगी त्रिशाला दत्त एकेकाळी बॉलिवूडमध्ये येऊ इच्छित होती. याचे कारण अभिनयाचे स्वप्न नव्हते, तर वडिलांच्या जवळ राहणे हे होते. त्रिशालाने ‘इन्साइड थॉट्स आउट लाउड’ पॉडकास्टमध्ये सांगितले की, लहानपणी तिला वाटायचे की चित्रपटांमध्ये आल्याने ती वडिलांसोबत जास्त वेळ घालवू शकेल. त्रिशाला ही संजय दत्त आणि त्यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे….

Read More

गिरीष महाजनांना सुनावणाऱ्या महिलेची प्रतिक्रिया समोर:25 मिनिटे ट्रॅफिकमध्ये, मुलीची काळजी ठरली कारण; टीना चौधरींनी सांगितले त्या दिवशी काय घडले?

दक्षिण मुंबईत भाजपच्या महिला मोर्चादरम्यान ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महिलेची ओळख अखेर पटली आहे. टीना चौधरी असे या महिलेचे नाव आहे २१ एप्रिल रोजी वरळीत झालेल्या या मोर्चात त्यांनी भाजप पदाधिकारी, पोलिस आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांनाही धारेवर धरले होते. सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच, टीना चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे आपली…

Read More

महालक्ष्मी सरसमधून 1 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट!:महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करणार ; CM फडणवीस

प्रत्येक जिल्ह्यातील महिलेला हक्काच व्यासपीठ देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आता नव्या रूपात तयार झालं असून, कोणत्याही जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाची स्पर्धा करण्यासाठी ते सज्ज आहे. या प्रदर्शनात केवळ सजावटीसाठी कंटेनर लावलेले नाहीत तर ते कंटेनर ऑफ इंडिया आहेत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात आत्तापर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार झाल्या आहेत, येणाऱ्या काळात १ कोटी…

Read More

धनबाद-कोळसा खाणीत स्लरी कोसळून 4 मजुरांचा मृत्यू:कोल वॉशरीमध्ये स्लरी लोडिंग करत होते, ढिगाऱ्याचा मोठा भाग कोसळल्याने अपघात

झारखंडमधील धनबाद येथे शनिवारी कोळशाची स्लरी (कोळशाची पावडर) कोसळली, ज्यामुळे 4 मजुरांचा मृत्यू झाला. हे सर्व मजूर मुनीडीह येथील BCCL च्या कोळसा वॉशरीमध्ये काम करत होते. याच दरम्यान अचानक ढिगारा कोसळला. आजूबाजूच्या मजुरांनी आणि स्थानिक लोकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी पोहोचले. ढिगारा हटवून चारही मजुरांचे मृतदेह बाहेर…

Read More