Headlines

गोपालकाला हा समाजात असणारे भेदभाव नष्ट करतो:देशमुख महाराज, विठ्ठल मंदिर येथे भागवत सप्ताह‎

जुने शहरात श्री विठ्ठल मंदिर येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या भागवत सप्ताहामध्ये सहाव्या पुष्पात हभप सुजित महाराज देशमुख यांनी भागवत कथेमधील श्रीकृष्णाच्या बाललीला स्कंध उलगडून सांगितले. गोपालकाला हा समाजातील भेदभाव नष्ट करतो, असे ते म्हणाले. यावेळी गोपालकाला व गोवर्धन पूजा करण्यात आली. भगवान श्रीकृष्ण नंदराजा, यशोदे कडे जसेजसे मोठे होतात तसे त्यांच्या बाल लिलांचे सुंदर…

Read More

डबल ढोलकी सरकारने हातात घंटा देण्याचे काम केले:जरांगे पाटलांच्या उपोषणावरून विजय वडेट्टीवारांची टीका; सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी- लक्ष्मण हाके

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि मराठा अभ्यासक व जरांगे यांच्यात रात्री 10.30 वाजेपासून चर्चा सुरू झाली. अडीच तासांच्या चर्चेनंतर सरकारने सर्व मागण्या मान्य असल्याचे…

Read More

अवैध व्यवसाय बंद करा; अन्यथा मोर्चा:दहीहंडा विकास मंचाचा इशारा, पोलिस प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन‎

ऐतिहासिक, सामाजिक आणि क्रांतिकारी वारसा लाभलेल्या दहीहंडा परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी दहीहंडा विकास मंचाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत मंचाने ठाणेदार गोपाल ढोले यांना निवेदन सादर केले. अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मंचाने दिला आहे. आज खुलेआम वरली मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर अवैध…

Read More

कुलगुरू ई-बाईक, कुलसचिव आले सायकलने:विद्यापीठाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मिळाला पर्यावरण स्नेही प्रतिसाद‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत, शनिवारी ३० मे रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘नो व्हिकल डे’ (वाहनमुक्ती दिन) पाळण्यात आला. त्यामुळे कुलगुरु ई-बाईकने तर कुलसचिव हे सायकलने प्रवास करित कार्यालयात दाखल झाले. दर शनिवारी नो व्हेईकल डे पाळण्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच केली होती. त्या…

Read More

जिल्हाधिकारी यांची अभिनव संकल्पना:प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बदल्या, 41 कर्मचारी, 5 मंडळ अधिकारी यांचा समावेश‎

जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात ऑनलाईन समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच झाला. त्याद्वारे पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी सर्व एक्केचाळीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली. ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांची बदली झाली. महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांची…

Read More

परिवर्तनाच्या संघर्षात प्रमुख मूक शक्ती बनून कार्यरत होत्या रमाई:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या समारोपप्रसंगी एम.डी. सरोदे यांचे प्रतिपादन‎

त्यागमूर्ती माता रमाईंचे जीवन हे केवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची पत्नी म्हणूनच नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाच्या महान संघर्षामागील एक मूक शक्ती म्हणून त्या कार्यरत होते. रमाईंच्या जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक होते. अनेक संकटे, मुलांचे निधन, आर्थिक अडचणी आणि एकाकीपणा सहन करूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. बाबासाहेबांच्या ध्येयावर त्यांचा अढळ विश्वास होता. म्हणूनच…

Read More

अ.भा.मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे घेण्याची मागणी:विदर्भ साहित्य संघाला जितेंद्र रोडे यांचे निवेदन‎

साहित्य, कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या अचलपूर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात यावे, अशी मागणी महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांनी केली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नवनियुक्त संचालिका डॉ. जयश्री कुळकर्णी यांचे अभिनंदन करत त्यांच्यामार्फत हे निवेदन संघाकडे सादर करण्यात आले. निवेदनानुसार अचलपूर नगरीला साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा…

Read More

जिद्द असेल तरच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते:प्रा. सागर भस्मे, दर्यापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा‎

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वच विषयाचे प्राथमिक ज्ञान घेणे महत्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान आत्मसात न करता त्यासोबतच विविध प्रकारची अद्यावत माहिती संकलित करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, ते क्षेत्र आपण निवडले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत,…

Read More

Ex-Judge Giribala Singhs Anxiety Amid CBI Questions on CCTV, Body Marks

Marathi News National Twisha Case: Ex Judge Giribala Singhs Anxiety Amid CBI Questions On CCTV, Body Marks भोपाळ42 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तरे मागितली आहेत. चौकशीचा मुख्य भर कथित गुन्हेगारी स्थळाशी छेडछाड, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल…

Read More

सेनगाव जवळ पिकअप वाहनाची दुचाकी वाहनाचा धडक:वरुड चक्रपाणच्या दोन शिक्षकाचा मृत्यू, सेनगाव पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

सेनगाव शहराजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. 30 रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण या गावातील रहिवासी असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूड चक्रपाण येथील शिक्षक संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे शनिवारी…

Read More