Headlines

दलाली खाऊ नका, भ्रष्टाचार करू नका, उधळपट्टी करू नका:काँग्रेस, शरद पवार गटाचा मोदींना टोला; काटकसरीच्या आवाहनाचा समाचार

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीच्या केलेल्या आवाहनाचा खरपूस समाचार घेतला आहे. देशाला बरबाद करण्याचा कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची. आता निवडणुका संपल्या की लगेच त्यांना त्याग आठवला. निवडणुका झाल्यामुळे त्यांना निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करू नका असे म्हणता येणार नाही, असे या पक्षांनी म्हटले…

Read More

धावत्या कारने अचानक घेतला पेट, चौघांनी मृत्यूला दिला चकवा:10 सेकंदात होत्याचं नव्हतं; वाढत्या उष्णतेचा कहर? हादरवणारी घटना

राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर धावत्या टोयोटा क्रिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या…

Read More

Amritpal Singh Bail Plea; Ajnala Police Station Attack

अमृतसर2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आसाममधील डिब्रूगड तुरुंगात बंद असलेले खडूर साहिबचे खासदार आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांची आज (11 मे) अमृतसर न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी होणार आहे. ही हजेरी अजनाला पोलीस ठाण्यावर झालेल्या बहुचर्चित हल्ला आणि निदर्शन प्रकरणात घेतली जाईल. मागील सुनावणीदरम्यान, अमृतपाल सिंग यांनी न्यायालयात एक नवीन याचिका दाखल करत…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त‎महाराष्ट्रभर फिरणार विशेष चित्ररथ‎:समता,बंधुता, ज्ञानाचा संदेश देणारा उपक्रम, जिल्ह्यात १८ व १९ मे रोजी होणार आगमन‎

प्रतिनिधी । मोर्शी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे. हा चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खा. समीर भुजबळ…

Read More

जि. प. बदली सत्र- चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे रविवारीच स्थानांतर:आज आरोग्य विभागाचा दुसरा टप्पा; विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन‎

प्रतिनिधी | अमरावती जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी १० मे रोजी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनात सकाळी १० वाजता सुरु झालेली प्रक्रिया दुपारी थांबली. दरम्यानच्या काळात चार विभागातील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. शासन निर्णयानुसार समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात ही प्रक्रिया पार पडली. उद्या, सोमवारी आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या…

Read More

नाले स्वच्छता, अतिक्रमण हटवण्यासह काटेकोरपणे उद्यान देखभालीचे निर्देश:झोन २ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त नाईकांकडून पाहणी‎

प्रतिनिधी । अमरावती शहरातील नाले स्वच्छता, अतिक्रमण हटवण्यासह काटेकोरपणे उद्यान देखभाल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील विविध परिसरांची पाहणी केल्यानंतर दिले. शहरात सध्या नाले व लहान नाल्यांची स्वच्छता तसेच उद्यानांची देखभाल, दुरुस्ती, अतिक्रमणाची समस्या आ वासून उभी आहे. नागरिक सातत्याने याबाबत तक्रारी करीत…

Read More

बंगाल CM सुवेंदु यांच्या पीएच्या हत्येप्रकरणी 3 संशयित ताब्यात:एसटीएफने यूपी-बिहारमधून पकडले; 6 मे रोजी चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली होती

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट (PA) चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर 5 दिवसांनी बिहारमधील बक्सर आणि यूपीमधील बलिया येथून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. बंगाल पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्स (STF) तिघांनाही आपल्यासोबत कोलकाता येथे घेऊन गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगालमधून बिहारमध्ये पोहोचलेल्या STF च्या पथकाने बक्सरमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी रात्री…

Read More

भारतीय गुरुकुल परंपरा शिकण्यासाठी सालबर्डी येथे १५० शिबिरार्थींचा सहभाग:सालबर्डी येथील संत मारोती महाराज देवस्थानाद्वारे शिबिराचे आयोजन‎

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मारुती महाराज देवस्थान येथे बालसंस्कार व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा डॉ.नलिनी कुर्वे यांच्या हस्ते केले. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव विजय भाकरे, उपाध्यक्ष रामदास गोटे, कोषाध्यक्ष दादा बरघट, विश्वस्त अनिल सोमदे, डीगांबर ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद पराळे, चेतन काळमेंघ आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित…

Read More

ज्योती जानोळकर विद्यालयाचा दहावी‎परीक्षेचा यंदाही ९५ टक्के निकाल‎:वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे फलित

प्रतिनिधी | अकोला येथील स्वर्गीय ज्योती जानोळकर विद्यालयाचा दहावी परीक्षेत यंदाही ९५ टक्के निकाल लावत यशस्वी उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित मानले जात आहे. यंदाच्या निकालात कुमारी गौरी महादेव घटाळे हिने ९४.६०% गुणासह प्रथम क्रमांक मिळवला, कुमारी श्रावणी रामकृष्ण इंगळे ९२. ८० टक्के…

Read More

साताऱ्यात विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता:अनेक ठराव मंजूर, पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येणार – संभाजी भगत

ऐतिहासिक सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जंयती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेलं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वीपणे पार पडलं. या संमेलनाच्या समरोप सत्रात संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत, कॉ. सुबोध मोरे, ॲड. वर्षा देशपांडे, वाहरु सोनवणे, अविनाश कदम आणि कॉ. धनाजी गुरव यांची भाषणे झाली. आपल्याला या संमेलनानंतर काय करायचं आहे…

Read More