Headlines

नाशिक काॅर्पोरेट जिहाद:चारही संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात कारागृहात असलेली संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल बलात्कार, विनयभंग, धर्मांतर गुन्ह्यात…

Read More

सिंहस्थाच्या 35 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डरसाठी तयार केले ॲप:नाशिकचे विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्तांचीही स्वाक्षरी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या कामांचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली ३५ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायटेक भामट्याला पोलिसांनी नवी मुंबईतून बेड्या ठोकल्या. अभिषेक संजय झरे (२३, रा. ऐरोली, नवी मुंबई) असे या ‘बीटेक’ पदवीधर संशयिताचे नाव आहे. त्याने फक्त मोबाइलमधील ‘ScanOnO’ या ॲपचा वापर करून विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल स्वाक्षरी तयार केल्याचे तपासात निष्पन्न…

Read More

Heat wave in North India; Storms, rain, rain and strong winds expected to stop in the West,

Marathi News National Weather Changes From Next Week: Heat Wave In North India; Storms, Rain, Rain And Strong Winds Expected To Stop In The West, दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक येणारे दिवस भारतीय हवामानाच्या दृष्टीने मोठे चढ-उतार असलेले ठरू शकतात. एकीकडे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व चक्रीवादळाचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे दिलासा देणारा पाऊस व थंड वारे…

Read More

नसरापूर प्रकरण:तीन वर्षीय बालिकेचा गुदमरून मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट, आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून पोलिसांनी मंगळवारी मृताच्या नातेवाइकांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार नोंदवले आहेत. दरम्यान, पीडितेच्या शवविच्छेदन अहवालातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे गुदमरून झाल्याचे स्पष्ट…

Read More

'ते 50 दिवस' कादंबरी अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय रद्द:उच्च न्यायालयाने अमरावती विद्यापीठाचा निर्णय नाकारला, विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमातून वगळण्याचा घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता ‘ते पन्नास दिवस’ आणि ‘धग’ या दोन्ही कादंबऱ्यांच्या आधारे परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. जून…

Read More

वीटभट्टीवरील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते:विभागीय आयुक्तांनी समस्या ऐकून उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अमरावती परिसरातील वीटभट्ट्यांवर आलेल्या आदिवासी आणि कोरकू मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय नियमांनुसार वीटभट्टीवरच शिक्षणाची सोय उपलब्ध असणे आवश्यक असताना, ती पुरेशी उपलब्ध नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुला-मुलींनी थेट विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची भेट घेतली. अविनाश बेलसरे,…

Read More

धन्वंतरी रुग्णालयाच्या संचालक मंडळाची 17 मे रोजी निवडणूक:बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन

अमरावती येथील बडनेरा रोडवरील धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक १७ मे रोजी होणार आहे. समाजातील सामान्य नागरिकांना माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणाऱ्या या रुग्णालयाच्या संचालक मंडळाची निवड नेहमीप्रमाणे बिनविरोध व्हावी, यासाठी जुने-जानते पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. मंगळवारी (आज) माध्यमांशी संवाद साधताना पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीवर भर दिला. डॉक्टर संवर्गाच्या सर्व सहा जागा बिनविरोध झाल्याचे…

Read More

सीईओ सत्यम गांधींचा मेळघाटात पहिला दौरा:पाणीपुरवठा, मनरेगा कामांची पाहणी; अधिकाऱ्यांना कठोर सूचना

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपला पहिला दौरा मेळघाट परिसरात केला. या दौऱ्यात त्यांनी पाणीपुरवठा आणि मनरेगाच्या कामांबाबत कठोर भूमिका घेत, कामचुकार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सीईओ गांधी यांनी मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमधील काही गावांना भेटी दिल्या. त्यांनी ग्रामस्थ तसेच स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जलजीवन मिशन, पाणीटंचाई निवारण,…

Read More

553 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर:लवकरच मतदार यादी, निम्म्या जिल्ह्यात आचारसंहिता

अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होईल, त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली जाईल. या ग्रामपंचायती जिल्ह्याच्या निम्म्या भौगोलिक क्षेत्रावर पसरलेल्या असल्याने निवडणुकीच्या काळात तेथे आचारसंहिता लागू होईल. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी…

Read More

मे महिन्याच्या ग्रामसभेत जनगणना, पाणीटंचाईवर होणार चर्चा:सीईओ गांधींनी परिपत्रक काढले, स्व-गणनेवर विशेष लक्ष

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मे महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या ग्रामसभांमध्ये जनगणना आणि संभाव्य पाणीटंचाई या दोन महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पंचायत विभागामार्फत हे परिपत्रक सर्वदूर पाठविण्यात आले आहे. भारत सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात झाली…

Read More