जनहित याचिकेमुळे गावाला मिळाले पक्के रस्ते, पूल व आरोग्य केंद्र:वेंगनूरचे नशीब बदलले; 38 कोटींतून गावाचा कायापालट
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जे काम होऊ शकले नाही, ते एका न्यायालयीन लढ्यामुळे अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या वेंगनूर ग्रामपंचायतीने न्यायालयीन लढ्याच्या जोरावर तब्बल ३८ कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून गावाचे नशीब बदलले आहे. वेंगनूर हे मुलचेरा तालुक्यातील अत्यंत दुर्गम व दुर्लक्षित असे गाव आहे. येथील ग्रामपंचायतीअंतर्गत अळंगेपल्ली,…