Headlines

कुलगुरु डॉ. बारहाते: सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास आवश्यक:आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती विद्यापीठात कार्यक्रम

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणात आरोग्य सांभाळणे हे मोठे आव्हान असून, म्हातारपण निरोगी जाण्यासाठी प्रत्येकाने योगाभ्यास अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचा ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभाग’, ‘एम.ए. योगशास्त्र’ आणि ‘पी.जी. डिप्लोमा योगा थेरपी’ यांच्या संयुक्त…

Read More

मोर्शीत जागतिक योग दिनी 101 जणांचे रक्तदान:डॉ. श्रीराव हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय आणि रक्तदाता संघाचा उपक्रम

मोर्शी येथे जागतिक योग दिनानिमित्त डॉ. श्रीराव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय आणि रक्तदाता संघाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तहसीलदार सागर ढवळे, दिव्यांग विजय कोकरे (अंबाडा), संदीप पोतदार आणि ऋषिकेश विघे यांनी रक्तदान करून शिबिराचा प्रारंभ केला. या शिबिरात विभाताई चौबे, महेक हरवानी, भाग्यश्री यावुल,…

Read More

नांदेड गुरुद्वाराचा कारभार नव्या कायद्यानुसार:1956 चा जुना कायदा रद्द, भाटीया समितीच्या शिफारशींनुसार राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नांदेड येथील जगप्रसिद्ध ‘दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहीब’ चा कारभार आता काळाच्या ओघात अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. या गुरुद्वारासाठी तब्बल ७० वर्षांपूर्वी म्हणजेच १९५६ मध्ये करण्यात आलेला कायदा रद्द करून, त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूलमंत्री…

Read More

अंजनगाव सुर्जी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा:मुख्याधिकाऱ्यांचे योगाला जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन

अंजनगाव सुर्जी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी योगाला जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन केले. निरोगी आरोग्यासाठी योगाभ्यास दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. नगराध्यक्ष अविनाश गायगोले, उपनगराध्यक्ष प्रियंकाताई मालठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष…

Read More

उमेश बघणे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर:जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांच्याकडून सत्कार

हिरुड, शहापूर येथील युवा आणि प्रगतशील शेतकरी उमेश बघणे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ते दत्तपूर्णा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष आहेत. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात जाऊन बघणे यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभाला प्रगतशील शेतकरी दत्तात्रय किटुकले, सरपंच विजयराव राऊत, गौरव…

Read More

तिवसात 50 वर्षांच्या कडुनिंबाच्या झाडाची विनापरवानगी कत्तल:निसर्गप्रेमींकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

तिवसा शहरातील सातरगाव मार्गावर सुमारे पन्नास वर्षे जुन्या कडुनिंबाच्या झाडाची विनापरवानगी कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. हे हिरवेगार कडुनिंबाचे झाड तिवसा नगरपंचायत हद्दीत होते. परिसरातील नागरिकांसाठी ते सावली आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार होते. रात्रीच्या वेळी या झाडाची कत्तल करून…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात:दुचाकी आणि पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

राज्यातील रस्ते अपघातांचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात सोलापूरमध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला आहे. विवाहमांडवा-चौंडाळा रस्त्यावर दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या जोरदार धडकेत…

Read More

संत गुलाबराव महाराज संस्थान विकासासाठी मुख्यमंत्र्यांची भेट:लोणी येथील आराखड्याची मागणी, 6 जुलैला फडणवीस येणार

संत गुलाबराव महाराजांच्या लोणी (टाकळी) येथील संस्थानच्या विकासासाठी विशेष आराखडा तयार करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. लोणी येथील संत गुलाबराव महाराज संस्थानला शासनाने ‘ब’ दर्जा दिला असला तरी, अपेक्षित विकास न झाल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. संत गुलाबराव महाराजांचे विचार आणि…

Read More

मेळघाटातील बोरधा ग्रामस्थांनी स्वतः खोदली बोअरवेल:110 कुटुंबांनी अडीच लाख रुपये जमा करून पाणी समस्या सोडवली

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा गावातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे पाणी मिळत नसल्याने, गावातील ११० कुटुंबांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा करून गावात बोअरवेल खोदली. यासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये गोळा करण्यात आले. बोरधा गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून लक्ष दिले जात…

Read More

छत्री तलाव परिसरात सूर्य निरीक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद:मराठी विज्ञान परिषदेने केले आयोजन, नागरिक-विद्यार्थ्यांचा सहभाग

मराठी विज्ञान परिषद आणि स्टारगेझर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील छत्री तलाव परिसरात दोन दिवसीय सूर्य निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात सुमारे ५० नागरिकांनी भेट दिली, त्यापैकी जवळपास ३० विद्यार्थी आणि पालकांनी विशेष सौर फिल्टरयुक्त दुर्बिणीद्वारे सूर्यबिंब तसेच त्यावरील सौर डागांचे (सन…

Read More