विधान परिषदेची रणधुमाळी:17 जागांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; महायुती आणि मविआत होणार थेट लढत; आमन-सामने कोण?
राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपापले मोहरे मैदानात उतरवले असून, १७ मतदारसंघांतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी अपक्ष आणि बंडखोरांनी अर्ज भरल्याने चुरस वाढली असली, तरी मुख्य मुकाबला…