Headlines

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक उद्या दिल्लीला परतणार:सरकारच्या विरोधात जंतर-मंतरवर आंदोलन करणार; दिल्ली पोलिसांनी सांगितले- आमची परवानगी घेतली नाही

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 6 जून रोजी भारतात परतण्यापूर्वी आपल्या जुन्या आवाहनातून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी 4 जून रोजी रात्री 10 वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करून समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः समर्थकांना विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन केले होते. आता त्यांनी म्हटले…

Read More

ऋचा चड्ढासोबत मुलांच्या सुरक्षेवरून महिलेची बाचाबाची:म्हटले- देशात 92 हजार पुरुष आत्महत्या करत आहेत, मुलांना काय खड्ड्यात टाकावे?

अभिनेत्री ऋचा चढ्ढाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात एक महिला कार्यक्रमादरम्यान तिला पुरुषांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. महिलांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले की, देशात मुलींना पुढे आणले जात आहे, पण मुलांच्या सुरक्षेवर लक्ष दिले जात नाहीये. महिलांनी रिचाला ‘पुरुषांच्या वेदनां’वर (मर्द के दर्द) एखादी कथा…

Read More

न्यायालयाचे आदेशावरून कनेरगाव येथील अतिक्रमण जमीनदोस्त:30 वर्षांच्या पाठपुराव्याला यश, मूळ मालकाला मिळाला ताबा

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव येथे सुमारे 3000 स्क्वेअर फुट पेक्षा अधिक जागेवर बळजबरीने करण्यात आलेले अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात नुकतेच हटविण्यात आले आहे. सदरील जागेचा तबा मुळ मलकाला मिळाला आहे. यानंतर आता बळजबरीने इतरांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हिंगोली येथील जितेंद्र साहू यांच्या वडिलांनी तालुक्यातील कनेरगाव नाका…

Read More

मराठा विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय:आता OBC प्रमाणेच मिळणार सर्व शैक्षणिक सवलती, फडणवीस सरकारची मोठी घोषणा

मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शासनाच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्यात येणार आहेत. शासनाच्या या नव्या धोरणांतर्गत, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात…

Read More

काला हिरण चित्रपटाच्या समर्थनार्थ समोर आली सलमानची एक्स गर्लफ्रेंड:निर्मात्याला सांगितले- चित्रपट बनवण्याचा पूर्ण हक्क आहे, फक्त दोषी लोकच धमक्या देतात

‘काला हिरण’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादादरम्यान, सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांना पाठिंबा दिला आहे. सलमान खानने कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर अमित जानी यांनी दावा केला आहे की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या प्रकरणी सोमी अलीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, अमित जानी यांना कोणत्याही विषयावर चित्रपट बनवण्याचा…

Read More

यशवंत बँक घोटाळा प्रकरण:शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, कराड जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता शेखर चरेगांवकर यास जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या यशवंत बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर…

Read More

मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांचा हल्ला, तीन जणांची हत्या:सात घरेही जाळली, गोळीबार सुरू होताच लोक जंगलात पळाले

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. सैटू-गामफाजोल उपविभागातील लोइबोल खुल्लेन गावात सकाळी सुमारे चार वाजता शस्त्रधारी हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी सात घरेही जाळण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन गटांमध्ये अनेक मिनिटे गोळीबार झाला. गोळीबार सुरू होताच गावातील लोक जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलात आश्रय घेण्यास भाग पडले. मृत्यू झालेल्यांची…

Read More

शर्तभंग प्रकरणांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे:नागरिकांना मंत्रालयात जाण्याची गरज नाही, निपटारा स्थानिक पातळीवर

राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करत शर्तभंग प्रकरणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्याचे अधिकार आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकार केवळ महसूल मंत्र्यांकडे होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयाची अधिसूचनाही जारी करण्यात आली…

Read More

चंद्रपूरच्या 15 गावांच्या सीमांकनासाठी उच्चस्तरीय समिती:दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १५ गावांच्या सीमांकनासाठी राज्य शासनाने अखेर उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या गावांचे महसुली अभिलेख उपलब्ध नाहीत. महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. या भागाला मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. सन १९५६ पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका…

Read More

काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे निलंबन:पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने कारवाई

विधान परिषद निवडणुकीत पक्षनेतृत्वाला कोणतीही पूर्वकल्पना न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे विदर्भातील दोन्ही जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय निश्चित झाला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसने साहेबराव…

Read More