संख्याबळ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली:मग पैसे घेतल्याचा आरोप कसा करता? संजय शिरसाट यांचा मविआला सवाल
संजय राऊत काँग्रेस-राष्ट्रवादीने सहकार्य केले नाही सांगत आहेत, संख्याबळ नसल्याने पराभव होणार हे सांगत आहेत. तरीही उमेदवारांनी माघार घेतली तर त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप राऊत कसे करू शकतात, असा सवाल शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नाही त्यामुळे निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही हे उबाठाला काही…