Headlines

जगभरातील टॉप लक्झरी ब्रँड्सचे ‘टॉप सिक्रेट’ मुंबईत:क्रिस्टियन डियोर, गुची, प्रादाच्या कपड्यांवर भरतकाम चाणक्य इंटरनॅशनल करते

क्रिस्टियन डियोर, प्रादा, गुची यांसारख्या जगातील 30 हून अधिक टॉप लक्झरी ब्रँड्सच्या कपड्यांवर भारतात भरतकाम केले जाते. हे नामांकित ब्रँड्स त्यांच्या कपड्यांवरील खास भरतकाम मुंबईतील ‘चाणक्य इंटरनॅशनल’कडून करून घेतात. येथील कारागीर हाताने केलेल्या भरतकामाने 5,000 वर्षांपूर्वीचा वारसा जपून आहेत. चाणक्य इंटरनॅशनलची सुरुवात गुजरातमधील विनोद शाह यांनी 1984 मध्ये केली होती. याचा उद्देश भारतीय कपड्यांवरील सामूहिक…

Read More

चिमेगावात पूर्णा नदीपात्रात वाळू तस्करांवर मोठी कारवाई:2 जेसीबी, 3 हायवा, 1 ट्रॅक्टरसह 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे २ जेसीबी, ३ हायवा, १ ट्रॅक्टरसह १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व हिंगोलीच्या महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ४ गुन्हा दाखल झाला आहे….

Read More

कंगनाच्या विधानावर अशोक पंडित संतापले:म्हणाले- बकवास करते, म्हणून तिला बॅन केले होते; अभिनेत्रीने रणवीर सिंगला पाठिंबा दिला होता

चित्रपट ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंगच्या समर्थनार्थ कंगना रणौतने दिलेल्या विधानावर FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की कंगना निरर्थक बोलते, म्हणूनच तिला बंदी घातली होती. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना पंडित म्हणाले, “इंडस्ट्रीतील अनेक लोक आम्हाला शिवीगाळ करू लागले आहेत. काल कंगनानेही काहीतरी म्हटले. लोक संपूर्ण प्रकरण समजून न घेताच टिप्पणी…

Read More

उद्धव ठाकरेंना अमरावतीत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांचा राजीनामा, शिंदे सेनेत जाणार?:बच्चू कडूंच्या संपर्कानंतर मोठी घडामोड

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे अमरावती जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ही घडामोड घडल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले गेले. पडोळे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश…

Read More

पडेगावमध्ये खोदकामात गंभीर निष्काळजीपणा:कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, मनपा गटनेते गणेश लोखंडे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही…

Read More

आई म्हणाली- NEET पुन्हा घ्याल, पण मुलगी परत आणू शकाल?:राहुल म्हणाले- आकांक्षाचा मृत्यू मोदींच्या व्यवस्थेचे पाप, भाजपने म्हटले- प्रचाराचा नेता

NEET पेपर लीक झाल्यानंतर नागपूरमध्ये आत्महत्या केलेल्या मऊगंजच्या विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या घरी शोककळा पसरली आहे. आपल्या मुलीला गमावलेल्या आई नीलम चतुर्वेदींचे दुःख प्रत्येक शब्दात जाणवते. त्या रडत म्हणतात, “पेपर तर तुम्ही पुन्हा घ्याल, पण माझ्या मुलीला परत आणू शकाल का?” त्यांच्या डोळ्यासमोर आजही आकांक्षाचे शेवटचे शब्द फिरत राहतात. नीलम सांगतात की त्यांची मुलगी अनेकदा स्वप्नात…

Read More

महाराष्ट्रात वाढणार उष्णतेची तीव्रता आणि अतिवृष्टी:30 वर्षांत 2 अंशांपर्यंत तापमान वाढीचा ‘सीएसटीइपी’चा इशारा

‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी’ (सीएसटीइपी) या संशोधन संस्थेने भारतीय हवामान विभाग आणि आयपीसीसीच्या आकडेवारीचा अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, 2021 ते 2050 या काळात महाराष्ट्रातील उन्हाळा आणि हिवाळ्यातील सरासरी तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. तसेच, पावसाचे दिवस आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे. वाढत्या वायू…

Read More

पडेगावातील निष्काळजी खोदकामाविरोधात गुन्हा दाखल करावा:मनपा गटनेते गणेश लोखंडे यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले; मात्र…

Read More

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या:तातडीने बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे, अधिक्षक निलाभ रोहन यांचे आदेश

हिंगोली जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघाले असून जिल्हयातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी गुरुवारी ता. ४ काढले असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरवाड्यापासून पोलिस दलात बदल्यांची प्रक्रिया सुरु होती. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून समुपदेशनाने…

Read More

केंद्राची उद्योगांना 16 लाख कोटी, तर शेतकऱ्यांना 1.88लाख कोटींचीच कर्जमाफी:देशातील शेतकऱ्यांच्या तुलनेत उद्योगपतींची कर्जमाफी आठ पट

केंद्र सरकारने उद्योगपतींना ११ वर्षांत १६.३५ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या तुलनेत बळीराजाला १,८८,२५४ कोटींचीच कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांच्या तुलनेत उद्योगपतींची कर्जमाफी साडेआठ पट आहे. २०१८-१९ या एकाच वर्षात केंद्राने कंपन्यांचे सर्वाधिक १,२५,३२० कोटींचे ‘लोन राइट ऑफ’ केले. त्याच वर्षी शेतकऱ्यांना १२,७२८ कोटींची कर्जमाफी दिली आहे. उद्योगपतींची वर्ष-२०१८-१९ ची कर्जमाफी दहा पट आहे. महाराष्ट्राच्या…

Read More