संगमनेर:जन्म-मृत्यू दाखल्यांचे अडथळे दूर करावेत – आमदार अमोल खताळ
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात नागरी नोंदणी प्रणालीद्वारे जन्म व मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीतील तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रणालीतील सर्व अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेमध्ये औचित्याच्या…