Headlines

एसटीच्या '44 प्रवासी मिळवा' उपक्रमाला चांगला प्रतिसाद:आषाढी एकादशीसाठी 46 हून अधिक गावांतून विशेष बस पंढरपूरला दाखल

राज्य परिवहन महामंडळाच्या ‘४४ प्रवासी मिळवा, गावातूनच थेट बस पंढरपूरला’ या विशेष उपक्रमाला यंदा अमरावती जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४६ हून अधिक विशेष बसेस पंढरपूरकडे रवाना झाल्या असून, त्या शनिवारी तेथे दाखल झाल्या. यामुळे या गावांतून आलेल्या शेकडो वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य झाले. एसटी महामंडळाने हा उपक्रम गेल्या आठवड्यापासून…

Read More

भातकुली पंचायत समितीची इमारत गळकी:सीईओ गांधींना आला अनुभव, नवीन दालनासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

भातकुली तालुक्यासाठी अमरावती येथे असलेल्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत लवकरच बदलणार आहे. ही इमारत फार जुनी झाल्याने मोडकळीस आली आहे. सध्या ती गळकी इमारत म्हणून ओळखली जात असून, पाणी गळण्याचा अनुभव खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनाही आला आहे. यामुळे इमारत बदलण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी…

Read More

शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी जिल्हा काँग्रेसची अमरावतीत निदर्शने:दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने आज, शनिवार, २५ जुलै रोजी निदर्शने केली. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले. केंद्र शासनाविरुद्ध प्रदर्शन करतानाच शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता दूर करून परीक्षा व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता…

Read More

नीट पेपरफुटी: दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठीहल्ल्याचा निषेध:मोर्शीत बसपाचे तहसील कार्यालयासमोर निदर्शने, कारवाईची मागणी

दिल्लीत नीट परीक्षेतील गैरव्यवस्थेविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मोर्शी येथे बहुजन समाज पार्टीने (बसपा) तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. नीट परीक्षेतील महाघोटाळा आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नीट परीक्षेचे पेपर वारंवार फुटत असल्याने देशभरात २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा आंदोलकांनी केला. या गंभीर विषयाकडे केंद्र…

Read More

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर बॉलिवूडची प्रतिक्रिया:आलिया म्हणाली- जेन-झीने इतिहास घडवला; प्रियंकाने नवीन पिढीचे कौतुक केले, शबाना म्हणाली- संघर्ष सुरूच राहो

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगातील अनेक मोठ्या व्यक्तीमत्त्वे उघडपणे पुढे आली आहेत. आलिया भट्ट, शबाना आझमी, प्रकाश राज, प्रियंका चोप्रा, स्वरा भास्कर, तिलोत्तमा शोम, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, ईशान खट्टर, अभिषेक बॅनर्जी, वीर दास, समय रैना, विजय वर्मा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल…

Read More

स्मार्ट मीटरविरोधात नांदगावात भाकपचे आंदोलन:योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे

नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) स्मार्ट मीटरच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, वीज ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करावा आणि जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाकपने स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आवाहनानुसारच नांदगावात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी स्मार्ट मीटरविरोधात…

Read More

Chandur Railway PMAY Housing Grant Distribution; Mayor Priyanka Vishwakarma

अनुदानाचा धनादेश स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा व इतर पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र आलेले घरकुल लाभार्थी. चांदूर रेल्वे नगरपरिषद प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेला (PMAY) गती दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील ३३ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांच्या हस्ते अनुदा . या १ लाख रुपयांच्या अनुदानात राज्य शासनाचे ४०…

Read More

राममंदिर देणगी चोरी- किरण एस. नवीन SIT चे नेतृत्व करतील:अयोध्या DIG, SSP देखील टीममध्ये, 2 दिवसांनी SC त अहवाल सादर केला जाईल

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात यूपी सरकारने नवीन विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. यात तीन सदस्य आहेत. याची कमान आयजी लखनऊ रेंज किरण एस. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी एसआयटीचे अध्यक्षपद आयएएस अधिकारी विजय विश्वास पंत भूषवत होते. किरण एस. त्यांच्या टीममध्ये होते, पण टीमचे प्रभारी विश्वास पंत होते. सर्वोच्च न्यायालयाने 13…

Read More

दीपके म्हणाले- आम्हाला कॉकरोच म्हटल्याबद्दल CJI यांचे आभार:नाहीतर आज प्रधान यांचा राजीनामा नसता; पंगा नाही, कॉकरोच आत शिरले की बाहेर येत नाहीत

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दीपके यांनी CJI सूर्यकांत यांचे आभार मानले. दीपके म्हणाले- जर तुम्ही आम्हाला कॉकरोच म्हटले नसते, तर तरुण रस्त्यावर उतरले नसते. प्रधान यांनी राजीनामा दिला नसता. अभिजीत यांनी हे देखील म्हटले- आम्ही कॉकरोच आहोत. एकदा घुसलो की, सहजासहजी बाहेर पडत नाही. अजून…

Read More

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का:3.1 रिश्‍टर स्केलची नोंद, म्हैसगव्हाण केंद्र बिंदू; 6 वर्षात 36 वेळा भूकंपाची नोंद

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून शनिवारी ता. २५ रात्री सहा वाजून ४९ मिनीटांनी जिल्हा भूकंपाने हादरला आहे. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्र बिंदू असून भूकंपाची ३.१ रिश्‍टर स्केल नोंद झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाने जिल्ह्यातील नागरिक आता पुरते घाबरले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून जमीनीतून आवाज येण्याची मालिका सुरु होती. अचानक जमीनीतून…

Read More