Headlines

गोल्डन टेंपलजवळच्या हॉटेलमध्ये मुलीवर बलात्कार:अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अमृतसरला आणले, तरुणाला निहंगांनी पकडले; हॉटेल मालकालाही अटक

अमृतसरमधील गोल्डन टेंपलजवळच्या हॉटेलमधील एका तरुणाने 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. हे कळल्यावर कुटुंबीयांनी निहंगांशी संपर्क साधला. त्यानंतर निहंग परमजीत सिंग अकाली आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आरोपीला पकडले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात हॉटेल मालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याने कोणत्याही…

Read More

'स्वराज्य सेवा प्रतिष्ठान'ला सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार:ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी सन्मानित, एक लाख रुपये प्रदान

दिवंगत सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा लोकगौरव पुरस्कार ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’ला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा रविवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’च्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘वनराई’ चे विश्वस्त आणि…

Read More

जि.प. अधिकाऱ्यांनी कार्यालय बदलात केला भेदभाव:कर्मचारी संघटनेचा आरोप, प्रक्रिया दुरुस्त करण्याची मागणी

अमरावती जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कार्यालय बदलाच्या प्रक्रियेत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. सलग पाच वर्षे एकाच कार्यालयात सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना हा भेदभाव झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रक्रियेचा त्वरेने फेरविचार करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पंकज…

Read More

अंजनगाव बारी ग्रामपंचायतीचा ठराव:स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापनेची मागणी, आमसभेत एकमुखी पाठिंबा

अंजनगाव बारी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीला ग्रामसभेने एकमुखी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूर करून तो शासन आणि वरिष्ठ पोलिस प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार, अंजनगाव बारी हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव आहे. म्हसला, वळद, गोविंदपूर, पार्डी आणि उदखेड या गावांचा समावेश करून येथे स्वतंत्र पोलिस…

Read More

मध्यम पावसाने तिवसा तालुक्यातील पिके बहरली:तीन दिवसांपासून दिलासा, जोरदार पावसाची प्रतीक्षा

तिवसा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांच्या खंडानंतर आलेल्या या पावसामुळे शेतातील पिके पुन्हा बहरली आहेत. सध्या तरी तालुक्यात पावसामुळे कोणत्याही नुकसानीची नोंद नाही, मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, त्यांची वाढ चांगली होत आहे. या तालुक्यात सोयाबीन हे…

Read More

पुरामुळे मालखेड-वडगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला:नागरिकांची गैरसोय; तात्काळ दुरुस्तीची मागणी

अंजनगाव बारी प्रतिनिधी: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनगाव बारी परिसरातील वडगाव (जिरे) येथील रायधोळ नदीला पूर आला आहे. या पुरामुळे वडगाव (जिरे)-मालखेड मार्गावरील पूल आणि स्मशानभूमीकडे जाणारा शेतकऱ्यांचा रस्ता वाहून गेला आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पादचारी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी…

Read More

अमरावतीकर रमले आशा-सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांमध्ये:संस्कार भारतीच्या 'आशा सुमनांजली' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती | संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शनिवारी रात्री ‘आशा-सुमनांजली’ या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार भारतीची महानगर शाखा आणि अमरावती महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या लोकप्रिय गीतांनी अमरावतीकरांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या ध्येय गीताने झाली. प्रा. डॉ. जयश्री वैष्णव, आशुतोष देशपांडे, प्रा. डॉ. सोनाली…

Read More

खड्ड्यांमुळे अमरावतीकरांचा जीव टांगणीला:मान्सूनपूर्व नियोजन आणि पॅचवर्कच्या कामात उणीवा उघड

अमरावती शहरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटी उघड झाल्या असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्गत गल्ल्यांपर्यंत सर्वत्र खड्डे पडले आहेत. राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाचा परिसर, रेडीयंट हॉस्पीटलसमोरील रस्ता, मोतीनगर ते राजेंद्र कॉलनीचा रस्ता आणि डी मार्टजवळील साईनगरकडे जाणारे वळण यांसारख्या…

Read More

आर्थिक अडचणीतून उच्च शिक्षित कुटुंबाची सामूहिक आत्महत्या:'सुसाईड नोट' लिहून संपवले जीवन, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून एका उच्चशिक्षित आणि सुखी मानल्या जाणाऱ्या त्रिकोणी कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे जीवन संपवले आहे. विषारी रसायनाचा (सोडियम नायट्रेट) धूर घेऊन या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली…

Read More

हिंगोलीत तडजोडीतून संसार जोडलेल्या जोडप्यांचा सत्कार:भरोसा सेल तुटलेली नाते जोडणारे विश्‍वासाचे केंद्र – पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा

पोलिस दलाचा भरोसा सेल हा केवळ तक्रारींचे निवारण करणारा विभाग नसून तुटलेली नाती जोडणारे विश्‍वासाचे केंद्र असल्याचे मत पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी येथे व्यक्त केले. हिंगोली पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलमार्फत समुपदेशन आणि तडजोडीतून तुटलेले संसार पुन्हा जोडण्यात आले आहेत. समुपदेशनानंतर आनंदी व सुखी संसार करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक…

Read More