Headlines

पुण्यात 2 अपघातात 2 ठार:बाणेरमध्ये 19 व्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा, तर डंपरच्या धडकेत बारामतीच्या तरुणाचा मृत्यू

पुणे शहरातील बाणेरमध्ये एका नियोजित गृहप्रकल्पाच्या 19 व्या मजल्यावरून पडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागीब एहसान राकीब (वय 19, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे मृत मजुराचे नाव आहे. त्याचा भाऊ मोहमद एहसान राकीब (वय 21, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी…

Read More

PM मोदींनी हुगळी नदीत बोटीतून प्रवास केला:नाव चालकाला मिठी मारली, ₹1000 दिले; 5 दिवसांपूर्वी झालमुडी खाल्ली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हुगळी नदीत नौकाविहार केला. यावेळी पंतप्रधानांनी स्वतः छायाचित्रणही केले. छायाचित्रांमध्ये ते हातात कॅमेरा घेऊन दिसत आहेत. त्यांनी नाव चालकाशी संवादही साधला. गंगेत नौकाविहार घडवणाऱ्या नाव चालकाला त्यांनी एक हजार रुपयेही दिले. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नौकाविहाराची छायाचित्रे शेअर केली. त्यांनी लिहिले, ‘प्रत्येक बंगालीसाठी गंगेचे एक खूप खास स्थान…

Read More

संजय गायकवाड यांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही:शिवसेनेची 'शिवाजी कोण होता' वादापासून फारकत; संयमाने वागण्याचा सल्ला

सत्ताधारी शिवसेनेने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. संजय गायकवाड यांच्या विधानाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक वाचर आहेत. त्यांच्या व्हायरल क्लीपचीही सत्यता आम्हाला माहिती नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी…

Read More

'मी खूप अनकम्फर्टेबल होते':काजोलने डेब्यू वेब सीरिजसाठी 30 वर्षांनंतर नो-किस पॉलिसी मोडली होती, आता कारण सांगितले

अभिनेत्री काजोलने नुकतेच सांगितले की, वेब सिरीज ‘द ट्रायल: प्यार, कानून, धोखा’ मध्ये पहिला ऑनस्क्रीन किस करताना सुरुवातीला त्या अस्वस्थ होत्या. त्यांनी सांगितले की, तीन दशके जुनी ‘नो किसिंग पॉलिसी’ त्यांनी केवळ भूमिकेच्या मागणीमुळे मोडली होती. काजोलने तिच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’…

Read More

आमदार संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले:आमदारकी रद्द करण्याची मागणी, सरकारला कारवाईचे आवाहन

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वादातून निर्माण झालेल्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला असून, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याची कडाडून टीका केली आणि अशा प्रकारची भाषा जनतेला मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, सार्वजनिक…

Read More

राऊतांना स्वतःची जागा वाचवण्यासाठी ठाकरेंचा पत्ता कट करायचा आहे:विधान परिषद ठाकरेंना, तर राज्यसभा काँग्रेसला असे सपकाळांनी ठणकावले- नवनाथ बन

मविआमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात सांगितले की आता विधान परिषद तुम्हाला हवी असेल तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय आताच घ्यावा लागेल. विधान परिषद जर तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल असे त्यांनी ठणकावत सांगितले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

निवडणूक आयोगाच्या नोटिशीला काँग्रेसने दिले उत्तर:म्हटले- निवडणूक आयोगाची कारवाई दुर्भावनेने प्रेरित, खरगे यांनी मोदींना दहशतवादी म्हटले होते

काँग्रेसने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘दहशतवादी’ विधानावर निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. पक्षाने म्हटले आहे की, या प्रकरणात आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन झालेले नाही आणि कोणत्याही कायद्याचेही उल्लंघन झालेले नाही. काँग्रेसने आपल्या उत्तरात आरोप केला की, निवडणूक आयोगाची नोटीस “दुर्भावनेने प्रेरित” आहे आणि ती योग्य चौकशीशिवाय जारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी…

Read More

भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीयांचा अवमान:अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी PM मोदींकडूनच प्रेरणा घेतली – काँग्रेस

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीय जनतेचा, भारताच्या हजारो वर्षांच्या समृद्ध इतिहासाचा व भारतीय विचारांचा अवमान आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच प्रेरणा घेत ही टीका केली, असा घणाघात काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी भारताचा उल्लेख नरक असा केला होता….

Read More

'लॉरेन्स ऑफ पंजाब' वेब सिरीजचा विरोध:कुटुंब म्हणाले- खोटा मजकूर दाखवत आहेत, नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यावर आणि त्याच्याशी संबंधित घटनांवर आधारित ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ या वेब सीरिजला त्याच्या कुटुंबाने विरोध दर्शवला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या कुटुंबाने या सीरिजमधील आशय, तिच्या निर्मितीची प्रक्रिया आणि प्रदर्शनाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, ही सीरिज केवळ तथ्यांपासून दूर नाही, तर ती न्यायव्यवस्था आणि पंजाबच्या गौरवशाली संस्कृतीचाही अपमान करते….

Read More

'संयम' अहवाल प्रकाशित:युवा व्यसनाधीनता गंभीर आव्हान; पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली चिंता

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी युवा पिढीतील अमली पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान असल्याचे म्हटले आहे. ‘संयम’ या अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या अहवाल प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अमली पदार्थांचा विपरीत परिणाम आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होत असल्याने याविरोधात ठोस कारवाई महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता चिंताजनक असून, केवळ…

Read More