राज्यात योग्यवेळी राजकीय भूकंप होईल:मंत्री संजय शिरसाट यांनी दिले संकेत; एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा दावा
दिल्लीतील आम आदमी पार्टीत झालेल्या बंडाळीनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला आता हवा दिली आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत हे आम्ही नाकारत नाही. पण ऑपरेशन टायगर असे सांगून केले जात नाही. या प्रकरणी एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील,…