![]()
नंदवंशी अहीर गवळी समाजाच्या वतीने ८ आणि ९ मे २०२७रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.यासाठी संयोजन समितीची निवड झाली. अध्यक्षपदीधीरजलाल सिद्ध यांची सर्वानुमते निवड झाली. यंदा २५सामूहिक विवाह करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ९ ते १०लाखांचा खर्च लोकवर्गणीतून उभा केला जाणार आहे, असेसिद्ध म्हणाले. दोन वर्षांनी शहरात सामूहिक विवाह होतात. जालना आणिछत्रपती संभाजीनगर दोन्ही जिल्ह्यातील समाज मिळून हा सोहळा करतो. गेल्या वर्षी जालन्यात १० सामूहिक विवाहझाले. यंदा छत्रपती संभाजीनगरात सोहळा होईल. समाजात हुंडाबंदीची कडक परंपरा आहे. हुंडा देणे किंवा घेणे पूर्णपणे निषिद्ध आहे. शहरात समाजाची एकूण ३५० कुटुंबेराहतात. माजी अध्यक्ष सुनील बागवाले यांचा विशेष सत्कार झाला. संगीता पाहाडीये यांचाही विशेष सन्मान केला. चौधरी आणि पंचांची ९० वर्षांची परंपरा या समाजात आजही चौधरींची संमती अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याहीशुभकार्यात चौधरींची पहिली उपस्थिती अनिवार्य मानली जाते. विवाह सोहळ्यातपंच स्वतः उपस्थित राहून आशीर्वाद देतात. यामुळे समाजबंध मजबूत राहतातआणि वाद कोर्टापर्यंत जात नाहीत.
Source link
9 लाखांत पंच अन् चौधरींच्या साक्षीने होणार विवाह:सामुहिक विवाह लावण्याची समाजाची 14 वर्षांची परंपरा, शहरात 350 कुटुंबे वास्तव्यास