Headlines

साल्हेर ग्रामपंचायतीला महिलांनी लावले कुलूप‎:पाणीटंचाईने वाढला संताप; अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने जोरदार घोषणाबाजी‎




तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या‎साल्हेर येथील महिलांनी रविवारी‎(दि. ७) थेट ग्रामपंचायत‎कार्यालयाला कुलूप ठोकत‎प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा‎घेतला. पिण्याच्या पाण्यासाठी‎वणवण भटकंती करावी लागत‎असताना ग्रामपंचायत कार्यालयात‎एकही जबाबदार अधिकारी अथवा‎कर्मचारी उपस्थित नसल्याने‎महिलांचा संताप अनावर झाला.‎//”पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली‎करा,” अशा घोषणाबाजीने परिसर ‎‎दणाणून गेला.‎ साल्हेर व परिसरात गेल्या काही ‎‎दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र ‎‎टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर ‎‎पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल‎भटकंती करावी लागत असून‎नागरिकांचे हाल होत आहेत. या ‎‎पार्श्वभूमीवर गावातील महिला‎आपल्या व्यथा मांडण्यासाठी‎ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचल्या.‎मात्र, तेथे कोणताही जबाबदार‎अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित‎नसल्याचे दिसून आले. यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎महिलांचा रोष आणखी वाढला.‎यानंतर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत‎कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला‎कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला.‎ २४ तासांत पाणी द्या,‎अन्यथा तीव्र आंदाेलन‎ २४ तासांत पिण्याच्या पाण्याची‎व्यवस्था न झाल्यास आंदोलन‎अधिक तीव्र करण्यात येईल, असा‎इशाराही महिलांनी प्रशासनाला‎दिला आहे. या आंदोलनामुळे‎बागलाण तालुक्यात पाणीप्रश्न पुन्हा‎ऐरणीवर आला आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *