Headlines

Admin

भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर:'राजा' कायम, पण देशाची संरक्षण स्थिती तणावात; यंदाचा पीक-पाण्याचा अंदाज काय?

संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील बळीराजाचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात आले. ३७० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या घटमांडणीनुसार, यंदा देशाचा ‘राजा’ कायम राहणार असला तरी, देशाची संरक्षण आणि आर्थिक स्थिती आव्हानात्मक राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाऊस आणि पिकांच्या बाबतीतही संमिश्र अंदाज वर्तवण्यात आल्याने…

Read More

पिंप्राळ्यात १५ मिनिटांत ६०० मीटरपर्यंत ओढल्या बारागाड्या:भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा

पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ७७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा ३५ वर्षीय तरुण भगत हिरामण भील यांनी १५ मिनिटांत ६०० मीटर बारागाड्या ओढल्या. पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालय असा उत्सव होता. गतवर्षी बारागाड्या निघाल्या त्या दिवशी पारा ४० अंशांच्या खाली होता. मात्र, या वर्षी रविवारी तापमान ४१ अंशांवर होते. म्हणून…

Read More

बठिंडा येथील सरकारी शाळेत महिला शिक्षिकेशी छेडछाड:सीनियर शिक्षकाने प्रयोगशाळेत नेले, चुंबन घेतले, प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श केला; परिणाम भोगण्याची धमकी दिली

बठिंडा येथील एका सरकारी शाळेत एका महिला शिक्षिकेने आपल्या वरिष्ठ शिक्षकावर छेडछाडीचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. महिला शिक्षिकेचा आरोप आहे की, शिक्षक तिला बहाण्याने लॅबमध्ये घेऊन गेला आणि तिच्या दोन्ही गालांवर चुंबन घेतले. जेव्हा ती रडू लागली, तेव्हा आरोपीने तिच्या खासगी अवयवांना स्पर्श केला. महिला शिक्षिकेचा आरोप आहे की, ती शिक्षकापासून सुटून पळू…

Read More

अक्षय्य तृतीयेचा गोडवा, ६५०० क्विं. आंब्यांची खरेदी:आठवड्याभरात वाढली आवक; हापूस, केसरला सर्वाधिक मागणी; सर्वसामान्यांची ‘लालबाग''ला पसंती‎

प्रतिनिधी | नाशिकरोड अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि या दिवशी घरोघरी आमरस-पुरणपोळीचा बेत ठरलेलाच असतो. हाच मुहूर्त साधत नाशिकच्या बाजारपेठेत आंब्यांचा गोडवा चांगलाच दरवळला. यंदा अक्षय तृतीयेनिमित्त नाशिकमध्ये तब्बल साडे सहा हजार क्विंटल आंब्यांची विक्रमी विक्री झाली असून, यामध्ये हापूस आणि केसर आंब्याने बाजी मारली आहे. बाजार समितीत आवक वाढली नाशिक बाजार समितीमध्ये…

Read More

परशुराम जयंती महोत्सव मिरवणुकीत जयघोष; १५०० भाविकांची उपस्थिती:ऐतिहासिक राम-परशुराम भेट सोहळ्याने यात्रेची शोभा वाढवली

परशुराम जयंती महोत्सवानिमित्त भद्रकाली ते काळाराम मंदिरापर्यंत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील भाविक, जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि ऐतिहासिक राम-परशुराम भेट सोहळ्याने या यात्रेची शोभा वाढवली. यानिमित्त सामूहिक रामरक्षा पठण करून भक्तिमय वातावरणात महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जय परशुरामच्या जयघोषात भाविकांनी जयघोष केला. मिरवणुकीतील विविध वेशभूषांनी…

Read More

‘भद्रा मारुती’च्या चरणी ८०, तर घृष्णेश्वराच्या दरबारी २० हजार भाविक:गतवर्षी खुलताबादला ६० हजार, वेरूळला १५ हजार भाविक‎

प्रतिनिधी | खुलताबाद/वेरूळ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भद्रा मारुती मंदिरात यंदा विशेष सजावटीसोबतच भाविकांची उपस्थितीही विक्रमी ठरली. दिवसभरात अंदाजे ८० हजारांहून अधिक भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी ही माहिती देताना भाविकांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले, तर वेरूळला घृष्णेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४…

Read More

MP-Chhattisgarh Heatwave Alert; Rajasthan Cities Above 40°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, यूपी, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील अनेक शहरांमध्ये रविवारी तापमान ४२°C च्या वर पोहोचले. महाराष्ट्रातील अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक ४५°C तापमान नोंदवले गेले. हे दोन्ही शहर रविवारी देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. मध्य प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये पारा ४२°C च्या वर…

Read More

नळाला मोटार लावताना‎उंडणगावात मुलाचा मृत्यू‎:गावात सण साजरा नाही‎

प्रतिनिधी | उंडणगाव अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात हृदयद्रावक घटना घडली. सवित्रीबाई फुले शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा गणेश खंडू सोनवणे (११) याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तो सकाळी घरासमोर नळाला पाण्याची मोटर लावत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुटुंबाला मदत म्हणून मोटर सुरू करत होता. त्याचवेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घरातील आजी,…

Read More

घाटनांद्र्यात ३५०० हेक्टरवर मिरची लागवड:एकरभरासाठी ४० हजार खर्च, शेतकऱ्यांचा जोखमीतून नफा शोधण्याचा प्रयत्न‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी मिरची लागवडीकडे यंदाही शेतकऱ्यांचा मोठा कल दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. यंदा लागवडीचा खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे. तरीही ‘जोखीम घेतल्याशिवाय नफा नाही’ या विश्वासावर शेतकरी मिरचीला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये घाटनांद्रा परिसरात २५० ते २७५…

Read More

निलजगाव पीएचसीतर्फे हनुमंतगावात टीबीमुक्त मोफत तपासणी अभियान:राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग

ढोरकीन | पैठण तालुक्यातील हनुमंतगाव येथे निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत टीबीमुक्त अभियान नुकतेच राबविण्यात आले. राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग म्हणून ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत निदान व उपचार अभियान घेण्यात आले. ग्रामस्थांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोगाचे निदान, उपचार याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी प्रयोगशाळेचे वरिष्ठ पर्यवेक्षक महेश कोरडे, टीबी हेल्थ व्हिजिटर इर्शाद सय्यद, रेडिओलॉजिस्ट…

Read More