Headlines

Admin

नवी मुंबईत भीषण अपघात:तळोजामध्ये सुसाट कारने 10 जणांना दिली धडक; 2 ठार, 8 जखमी, चालक फरार

नवी मुंबईतील तळोजा परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नियंत्रण सुटले, भरधाव कारने उडवले प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर 10 परिसरातून…

Read More

जयपूर- रस्त्याच्या कडेला कुटुंबावर ट्रेलर चढला, 4 जणांचा मृत्यू:मुलांच्या मृतदेहाचे तुकडे नाल्यात पडले, सर्वत्र मांस विखुरले होते, आईचे दोन्ही पाय कापले गेले

जयपूरमध्ये भरधाव ट्रेलरने फूटपाथवर बसलेल्या एका कुटुंबातील ५ जणांना चिरडले. या अपघातात तीन मुलांचा आणि वडिलांचा मृत्यू झाला. आईचे दोन्ही पाय तुटले. अपघात इतका भीषण होता की मुलांच्या मृतदेहांचे तुकडे झाले. एका मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. सर्वजण नाल्यात पडले. श्याम नगर पोलीस स्टेशन हद्दीतील २०० फूट बायपासवरील कमला नेहरू नगरमध्ये मंगळवारी सकाळी ८:४६ वाजता…

Read More

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा ई-कॉमर्स सांभाळणार

टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन ‘वेस्टसाइड’च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश वेस्टसाइडची ऑनलाइन उपस्थिती वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करणे हा आहे. तथापि, कंपनीकडून यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. नोएल टाटा ट्रेंटचे अध्यक्ष आहेत आणि ते नोव्हेंबर 2026 मध्ये हे पद…

Read More

सांगली जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा:नोकरभरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द; खोत-पडळकरांना दणका

राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना, ‘सरकारने आपले म्हणणे मांडावे, परंतु त्यासाठी नोकरभरती थांबवता येणार नाही,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने बँकेतील…

Read More

केरलमच्या वायनाडमध्ये भूस्खलन, एकाचा मृत्यू, अनेकजण अडकले:ढिगारा पाण्यासोबत वाहून रस्त्यावर आला; बोगद्याच्या बांधकाम स्थळावर अपघात

केरलममधील वायनाडमध्ये पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक अडकल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली. येथे मलप्पुरम-वायनाड बोगदा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. बोगद्यातून माती काढून बाहेर जमा करण्यात आली होती. पावसामुळे माती सरकली, त्यामुळे झाडे उन्मळून पडली आणि बॅरिकेड्सही वाहून गेले. पोलीस…

Read More

Patil Slams CM Over Nashik Temple Protest; Congress Satyagraha Begins

अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाची घोषणा केली असून, या आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरातून होत आहे. आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश . पाहा काँग्रेसच्या आंदोलनाचे फोटोज… ‘ढगफुटी’च्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा सपकाळ म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असली तरी आंदोलनाला मर्यादित स्वरूप देण्यात आले आहे….

Read More

रायगडमध्ये डोंगराला तडे:नाणेघोळ गावावर भूस्खलनाचे सावट! धोका ओळखून 60 ते 70 ग्रामस्थांचे स्थलांतर

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असतानाच पोलादपूर तालुक्यातून एक अत्यंत धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ‘नाणेघोळ’ गावाजवळील डोंगराला अतिवृष्टीमुळे चक्क अर्धा किलोमीटर लांबीच्या आणि अर्धा ते एक फूट रुंदीच्या महाकाय भेगा पडल्या आहेत. डोंगराचा भाग खचू लागल्याने आणि संभाव्य भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलत, गावातील…

Read More

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई:तब्बल 2 लाख 11 हजार रुपये किमतीची 1125 किलो दूध पावडर ताब्यात, भेसळखोरांचे धाबे दणाणले

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली असून, अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कडक कारवाया केल्या जात आहेत. या धडक मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असतानाच राज्यात मुंढे यांच्या बदलीच्या जोरदार चर्चाही रंगू लागल्या होत्या. मात्र, या चर्चांच्या पार्श्वभूमीवरही कारवाईचा धडाका सुरूच असून, नुकतीच त्यांच्या…

Read More

पुणे पोलिसांची आषाढी वारीसाठी 'हायटेक' सुरक्षा:ड्रोन, एआय, सीसीटीव्हीने लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीच्या अचूक नियोजनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘हायटेक’ सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदाचा वारी सोहळा सुरक्षित व सुलभ करण्याचा संकल्प पुणे पोलीस प्रशासनाने केला आहे. पालखीचा अचूक मार्ग, प्रगती…

Read More

Ahmedabad Serial Blast Case Verdict; HuJI Terror Attack

अहमदाबाद5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गुजरात उच्च न्यायालयाने 2008 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने सर्व 38 दोषींची फाशीची शिक्षा आणि इतर 11 दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. यासोबतच, उच्च न्यायालयाने 56 मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये आणि 200 हून अधिक जखमींना प्रत्येकी 1-1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश…

Read More