Headlines

Admin

धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा-हेमा मालिनीने मुलांसोबत एकत्र राहावे:सनी-बॉबीबद्दल म्हटले- आम्ही प्रसिद्धी करत नाही, आम्ही कुटुंब आहोत; मृत्यूच्या फेक न्यूजवर प्रतिक्रिया

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी आता हेमा मालिनी यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, निधनापूर्वी काही काळ आधी धर्मेंद्र यांनी त्यांना जवळ बोलावून सांगितले होते की, मुलांसोबत मिळून मिसळून राहा. यावेळी हेमा मालिनी यांनी सावत्र मुले सनी-बॉबी यांची प्रशंसा केली आणि धर्मेंद्र यांच्या निधनाची खोटी बातमी आल्यावर नाराजी व्यक्त केली…

Read More

अवघ्या दोन महिन्यांत रस्त्याचे काय हाल झाले?:मिसिंग लिंक'वरील दुर्घटनेवरून रोहित पवार, दानवे, राऊतांसह देशपांडेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या…

Read More

E10 गाड्यांमध्ये E20 इंधनामुळे मायलेज कमी होऊ शकते:रबरचे भागही खराब होऊ शकतात; ARAI च्या इंजिन चाचणी अहवालात खुलासा

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ARAI च्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, जुन्या E10 कंप्लायंट गाड्यांमध्ये E20 इंधनाचा वापर केल्यास इंधन प्रणालीचे रबर पार्ट्स खराब होऊ शकतात. मात्र, हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. 10 प्रश्नांच्या उत्तरात संपूर्ण प्रकरण समजून घ्या… प्रश्न 1: ARAI च्या या अहवालात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय…

Read More

इंद्रायणी पुरामुळे आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंध:केवळ मर्यादित भाविकांनाच मंदिरात प्रवेश, 8 जुलैला सोहळा

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे यंदाचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात हा सोहळा साधेपणाने आणि कडक नियमांच्या अधीन राहून आयोजित केला जाईल. संततधार पाऊस आणि पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हा…

Read More

अंशुला कपूरचे रोहन ठक्करसोबत लग्न झाले:सावत्र बहिणी जान्हवी-खुशीने विधी पार पाडले, मंडपाजवळ दिवंगत आईचा फोटो, अर्जुन कपूर भावूक

बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूर यांची बहीण अंशुला कपूरने 6 जुलै रोजी रोहन ठक्करसोबत लग्न केले आहे. या लग्नात कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांव्यतिरिक्त चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली. लग्न पारंपरिक हिंदू रितीरिवाजांनुसार झाले, ज्यात सावत्र बहिणी जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनीही विधी पार पाडले. तर मोठा भाऊ अर्जुन कपूर अंशुलाला मंडपापर्यंत…

Read More

मुंबईत भरवस्तीत शिरली 7 फुटांची महाकाय मगर – VIDEO:पवई तलावाजवळ उडाली खळबळ, पाहा थरारक रेस्क्यू

मुंबईतील पवई तलाव परिसरात मगरींचा वावर नवीन नाही, मात्र जेव्हा ही मगर थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचते, तेव्हा काय परिस्थिती ओढवते, याचा थरारक अनुभव रविवारी स्थानिकांनी घेतला. पवई तलावाजवळील मोरारजी नगर परिसरात चक्क ७ फूट लांबीची महाकाय मगर भरवस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. येथील एका दर्ग्याबाहेर ही मगर आढळून आल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती….

Read More

Rohit Pawar Demands Police Dismissal; Fadnavis Orders Action Over Jamod Case

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील मिसिंग प्रकरणात निर्दोष आदिवासी पिता-पुत्राला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक करून अमानुष छळ केल्याचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा विषय उपस्थित . ‘जय भीम’ चित्रपटासारखी घटना महाराष्ट्रात घडली रोहित पवार यांनी या घटनेची तुलना ‘जय भीम’ चित्रपटातील कथेशी केली. त्यांनी सांगितले की,…

Read More

'नागरिकांचे जीव गेल्यावरच तुम्हाला जाग येते का?':उघड्या मॅनहोलवरील मृत्यूंवरून मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकांना दणका

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. मुंबईसह इतर भागांमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यातच झाड कोसळण्याच्या घटना व उघडे मॅनहोल असल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. तुम्हाला नागरिकांचे जीव गेल्यावरच जाग का येते? लोकांच्या जीवाला महापालिका काहीच महत्त्व देत नाही का? अशा कडक…

Read More

पावसाळी अधिवेशन:परप्रांतीयांच्या बेकायदेशीर बाईक-टॅक्सींना राज्यात ब्रेक, आता 'डोमिसाईल' सक्तीचे; विधानसभेत सरकारची घोषणा

मुंबईसह संपूर्ण राज्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल अवघ्या तासाभरात स्थगित झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज पुन्हा सुरुवात झाली. आजच्या सत्राच्या सुरुवातीलाच राज्यातील अनधिकृत वाहतूक आणि महिला-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर राज्य सरकारने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बाईक-टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता केवळ ‘डोमिसाईल…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत!:जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे…

Read More