Headlines

Admin

कृउबासच्या उपसभापतिपदी अर्चना कणसे बिनविरोध:सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड‎

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत नवा इतिहास रचला गेला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. अर्चना कणसे यांची बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अलिकडेच एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विहित मुदतीत अर्चना…

Read More

दोन पुरात वाहून गेले, दोघांवर वीज कोसळली:जून महिन्यात चार बळी, 134 जण जखमी, 500 हून अधिक घरांची पडझड‎

जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नसला तरी त्या महिन्यातील पावसाने ४ बळी घेतले असून इमारतींची पडझड व पावसाशी संबंधित इतर आपत्तीमुळे १३४ जण जखमी झाले आहेत. वादळ-वारा आणि जोराचा पाऊस यामुळे सुमारे ५०० हून अधिक घरांची पडझड झाली. शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जूनच्या पावसामुळे १४ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांतील ४ शहरे आणि २६ गावे बाधित…

Read More

Government sorghum procurement center closed; Protest at tehsil office, many sorghum left at home, payments for purchased sorghum pending

येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुढारी तथा नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. बंद पडलेले खरेदी केंद्र त . खासगी बाजारपेठेत ज्वारी पिकाला कवडीमोल भाव असल्याने शासनाने हमीभाव देऊन पंधरा दिवसांपूर्वी येथे ज्वारी खरेदीचे शासकीय केंद्र सुरु केले…

Read More

आषाढीत पहिल्यांदाच ‘एअर ॲम्बुलन्स'ची सुविधा:आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतला आढावा, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 3097 डॉक्टरांचे पथक तैनात‎

प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी यात्रा कालावधीत गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, तसेच यंदा यात्रा काळात आरोग्य विभागाकडून ३ हजार ९७ डॉक्टरांचे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर…

Read More

बार्शीत नऊ दिवसाआड पाणीपुरवठा:296 कोटी ख र्चाच्या कामात महामार्ग व शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनाचा वाद‎

शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती अत्यंत बिकट आणि तीव्र पाणीटंचाईची आहे. सध्या बार्शीकरांना ४ ते ६ दिवसाआड किंवा काही भागात ८ ते ९ दिवसांनंतर विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत (३० जून २०२६) आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. बार्शी शहराला दररोज २ कोटी ५० लाख (अडीच कोटी)…

Read More

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूरला दिली पहिलीच भेट:बळीराजा सुखी तर संसार सुखी, पाऊस पडू दे; सुनेत्रा पवारांचे विठ्ठलाला साकडे

बळीराजा सुखी झाला तरच जगाचा संसार सुखी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर चांगला पाऊस पडू दे, राज्यातील माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे, असे साकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी घातले. उपमुख् . मंचर तालुक्यातील एका मठाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. यानिमित्ताने त्यांचा दौरा होता. यावेळी आमदार दिलीप वळसे…

Read More

योजनांचा लाभ न मिळणाऱ्या रूग्णांवर धर्मादायमध्ये मोफत उपचार करणार:आमदार अभिजीत‎ पाटील यांची ग्वाही‎

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत पात्र न ठरणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. परंतु ज्या गरजू रूग्णांना या दोन्ही मदतीचे लाभ मिळत नाहीत अशा रूग्णांना डॉक्टरांनी धर्मादाय रुग्णालयांमध्ये रेफर केल्यास आपण त्यांच्या मोफत इलाजाची सोय करून देणार असल्याची ग्वाही माढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. ते माढा येथील डॉ…

Read More

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची आवश्यक:साहेबराव नागणे यांचे उपरीमध्ये प्रतिपादन, देशमुख हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण शिबिर‎

सध्या दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांवरून दररोज महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक पैलवान…

Read More

संत मुक्ताबाई मार्ग:पालखी मार्गाची दुरवस्था; रिधोरे, माढा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, 2 वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतरही रस्ता मृत्यूचा सापळा‎

पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखी मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. रिधोरे ते माढा या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. २४ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईंच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. २० जुलै रोजी रिधोरे, वडशिंगे मार्गे…

Read More

पद्म विभूषण पंडवानी गायिका तीजन बाई यांचे निधन:आजोबांकडून महाभारत ऐकवण्याची प्रेरणा मिळाली, 13 व्या वर्षी रंगमंच प्रवेश

छत्तीसगडच्या लोककला आणि पंडवानी गायनाला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे आज निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांनी शनिवारी मध्यरात्री 3.15 वाजता रायपूर एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या गत काही महिन्यांपासून आजारी होत्या. तीजन बाई यांनी आपल्या सशक्त आवाजाने, प्रभावी अभिनयाने आणि अनोख्या सादरीकरण शैलीने पंडवानीला केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही…

Read More