विरमगाव रस्त्याची 30 वर्षांपासून दुरवस्था; विद्यार्थी, नागरिकांचे हाल:1995 नंतर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत, दुरुस्तीची मागणी
तालुक्यातील विरमगाव येथील मुख्य रस्त्याची गेल्या तीन दशकांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ३० वर्षांत या रस्त्याचे साधे डांबरीकरणही होऊ शकले नाही ही अत्यंत संतापजनक बाब आहे. या खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना रोज नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. १९९५-९६ या काळात अशोक पाटील डोणगावकर मंत्री असताना या विरमगाव मुख्य…