Headlines

Admin

तंत्रज्ञानाचे नवे पर्व:तेलंगणमध्ये जिथे सुपीक जमीन होती, तिथे डेटा सेंटर्स

तेलंगणाचा रंगारेड्डी जिल्हा. जमिनींचे माहेरघर. येथील कोकापेट, नरसिंगी, मेकागुडा, शमशाबाद यांसारख्या ग्रामीण भागांत एकेकाळी भात आणि कापसाची पिके डोलत होती. सुमारे ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत या जमिनीचा भाव १ ते ३ कोटी रुपये प्रति एकर होता, पण या जमिनी आता राज्याची डिजिटल इकॉनॉमी बनल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची साक्ष देणारी कोकापेटमधील जमीन आता १३७ ते १५१ कोटी…

Read More

पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण:मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे…

Read More

महिलेवर दुष्कर्म:भोंदू मनोहर मामावर गुन्हा, गुन्ह्यांच्या तपासासाठी 5 अधिकाऱ्यांची एसआयटी

करमाळा येथील भोंदूबाबा मनोहर मामाने २ दिवसांपूर्वी एका महिलेला अमावास्येच्या दिवशी आजारपण दूर करण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नव्याने समोर आली. भोंदूबाबाविरोधात सहा गुन्हे दाखल झाले असून या सहाही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ५ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. संबंधित महिलेचे आजारपण दूर करतो, अमावास्येला…

Read More

पूल दुरुस्तीसाठी मराठवाड्यास हवेत 2,051 कोटी रुपये:केंद्राकडून निधी मिळताच क्षेत्रनिहाय वाटप- ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या मराठवाडा विभागातील पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने मोठी पावले उचलली आहेत. विभागातील जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील खराब झालेले रस्ते आणि खचलेल्या पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २,०५१.६४ कोटी रुपयांचा विस्तृत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण आणि विक्रम काळे…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण:उदयजी, तुम्हाला सहकार विभाग द्यावा का?- मुख्यमंत्री फडणवीस

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या खांदेपालटाबाबत अत्यंत सूचक आणि राजकीयदृष्ट्या रंजक विधान केले. “तुम्ही उद्योगमंत्री म्हणून उत्तम काम करताय, पण तुमची इच्छा बघता शिंदे साहेबांशी बोलून तुम्हाला सहकार विभाग द्यावा का, असा विचार माझ्या डोक्यात आला,’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने…

Read More

India Spy Secrets Revealed; Pakistan Nuclear Program

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिव्य मराठी सिरीज ‘स्पाय फाइल्स’ मध्ये तुम्ही वाचत आहात – ‘ऑपरेशन कहूटा’. भाग-1 मध्ये तुम्ही वाचले – 1974 मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर पाकिस्तानही अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत लागला होता. अभियंता डॉ. अब्दुल कदीर खान यांनी नेदरलँड्समधील एका अणुप्रयोगशाळेतून अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान चोरले होते. अब्दुल यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी भोपाळमध्ये झाला होता. भारताची गुप्तचर संस्था…

Read More

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी…

Read More

पाण्याच्या टाकीत 5 दिवस मृत बैल सडत होता,:तेच पाणी 51 गावांना पुरवले- खडसे, मुक्ताईनगरच्या सारोळ्यातील प्रकार विधान परिषदेत

मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा प्रादेशिक जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत धक्कादायक प्रकार विधान परिषदेत चर्चेस आला. या केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडून एका बैलाचा मृत्यू झाला. मात्र, ५ दिवस हा मृत बैल टाकीतच सडत होता आणि याच टाकीतील पाणी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ५१ गावांतील हजारो नागरिकांना पिण्यासाठी पुरवले गेले. या गंभीर हलगर्जीपणावरून एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला…

Read More

JK मध्ये 'लष्कर'चे 2 अतिरेकी ठार झाल्याचा दावा:पहलगाम हल्ल्यानंतरच्या हिट लिस्टमध्ये समावेश होता; शोपियांमध्ये 3 तास चकमक

जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथील सैदपोरा परिसरात शनिवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची बातमी आहे. सुरक्षा दलांनी याची पुष्टी केलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (LeT) चे प्रमुख ऑपरेटिव्ह होते. एक दहशतवादी झाकीर अहमद गनी त्या 14 दहशतवाद्यांच्या यादीत सामील होता, जी पहलगाम हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी जारी…

Read More

Pakistani Actress Fake Post: Alpha Movie Claim Debunked

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीजच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात दावा केला जात आहे की, तिने आलिया भट्ट आणि शरवरी अभिनीत ‘अल्फा’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आणि लिहिले की, ‘अल्फा, धुरंधरला पाकिस्तानकडून दिलेले उत्तर आहे.’ तसेच YRF चे आभारही मानले. मात्र, पडताळणीत हा दावा खोटा ठरला. व्हायरल दावा…

Read More