Headlines

Admin

वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजनगाव शिवारात असलेल्या हळदीवर प्रक्रिया करून पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर बिहार राज्यातील मजूर कामावर आहेत….

Read More

पंजाबमध्ये मेहुण्याला जिवंत जाळले, व्हिडिओ समोर आला:मध्यस्थी करायला आलेली वहिनी देखील जळून मरण पावली; पत्नीला घेण्यासाठी सासरी गेला होता

तरनतारनमध्ये आपल्या पत्नीला माहेरून सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या पतीला त्याच्याच मेहुण्याने पेट्रोल टाकून आग लावली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी आलेली वहिनीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, त्यामुळे तिचाही जीव गेला. इतकंच नाही, तर या दोघांना आगीच्या हवाली करणारा मेहुणाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, त्यामुळे तोही गंभीररित्या भाजला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला वाचवले. ही घटना…

Read More

दिंडी मार्गावर 500 झाडांची लागवड सुरू:विविध संस्था, सेवा मंडळांकडून सामाजिक, धार्मिक उपक्रमांचेही आयोजन‎

संत नगरी प्रसाद मंडळ व चिरंतन फाऊंडेशनद्वारा अकोट ते पंढरपूर दिंडी मार्गावर ५०० पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात येत असून या पर्यावरण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संतश्रेष्ठ श्री वासुदेव महाराज दिंडी सोहळ्याचे पंढरपूरला २६ जूनला प्रस्थान झाले. यानिमित्त अनेक संस्था व सेवा मंडळांकडून विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच अंतर्गत…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी विधिमंडळातच भरला…

Read More

श्रीमंत महिलांना क्रेडिट कार्ड, ग्रामीण भागातील लोकांना रोख रक्कम पसंत:84% महिला उद्योजिकांची पसंती डिजिटल साधनांना; कर्ज, गुंतवणुकीसाठीही ॲपचा वापर

देशातील महिला केवळ डिजिटल पेमेंट करण्यापुरत्या मर्यादित नाहीत. त्या व्यवसाय ऑपरेशन्स, कर्ज आणि गुंतवणुकीसाठीही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवत आहेत. डीबीएस बँक इंडिया आणि डेलॉय इंडियाच्या अभ्यासानुसार, ८४% महिला उद्योजकांसाठी डिजिटल पेमेंट टूल्स सर्वात लोकप्रिय आर्थिक प्लॅटफॉर्म बनले आहेत. या सर्वेक्षणात देशभरातील १,३४२ व्यावसायिक, उच्च नेटवर्थ म्हणजे श्रीमंत आणि ग्रामीण भागातील कार्यरत महिलांचा समावेश करण्यात आला….

Read More

किड्स पॅराडाईजमध्ये अवतरली ‘ज्ञानाची पालखी’‎:महापुरुषांना वंदन, पुस्तकांचे पूजन अन् संस्कारमय उपक्रमाचे शैक्षणिक वर्षाची सुरुवात‎

पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ चा प्रारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आला. शाळेत विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तके, भारतीय संविधान, ग्रामगीता, तुकाराम गाथा आदी ज्ञानग्रंथांचे पूजन करून त्यांची पालखी काढली. उत्साहपूर्ण वातावरणात काढलेल्या ‘ज्ञान दिंडी’ने परिसर संस्कारमय झाला. यावेळी या ज्ञानाच्या पालखीचे पूजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका…

Read More

महान परिसरात सोयाबीन पेरणीला वेग:खरीपाची लगबग सुरू, यंदा कपाशीला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती‎

महान आणि परिसरात खरीपाच्या सोयाबीन पेरणीने आता वेग घेतला असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सद्यस्थितीत केवळ बोटावर मोजण्याइतकीच म्हणजेच अवघी पाच टक्के पेरणी शिल्लक राहिली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपली कामे आटोपली आहेत. यंदा मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र, पावसाळ्याच्या तब्बल १७ दिवसांनंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. २५…

Read More

सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास- प्रा. ललित काळपांडे:माळी महासंघाच्या वतीने गुणवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार‎

अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. सद्य परिस्थितीतील विविध परीक्षांमधील स्पर्धा व चढाओढ पाहता विद्यार्थ्यांनी व अतिशय परिश्रामने सातत्याने प्रयत्न केले यशप्राप्ती होईल, असे प्रमुख वक्ते प्रा. ललित काळपांडे म्हणाले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश संघटक गणेश काळपांडे, उद्घाटक अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त…

Read More

एक कोटी 75 लाखांचे जप्त‎अमली पदार्थ जाळून नष्ट‎:अकोला पोलिसांची कारवाई; 56 गुन्ह्यांमधील जप्त केलेला होता मुद्देमाल

येथील पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत जप्त केलेला तब्बल एक कोटी ७५ लाख ८६ हजार २४७ रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर जाळून नष्ट केला आहे. यामध्ये सुमारे २४६ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या विविध अमली पदार्थांचा (ड्रग्ज) समावेश होता. ही विल्हेवाटीची मोठी कारवाई नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात पार पडली. अकोला जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एनडीपीएस…

Read More

रेल्वेच्या कामामुळे शेतात पाणी; भरपाई तातडीने द्या:शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन‎

अकोट- खंडवा रेल्वे मार्गाच्या कामामुळे शेतात पाणी साचले आहे. तातडीने रेल्वे प्रशासनाने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी करत शेतकरी संघटनेने (रघुनाथ दादा प्रणित) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संघटनेने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन सादर केल्याची माहिती विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिली. रेल्वे विभागाने अकोट ते खंडवा रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम हाती घेतले आहे….

Read More