वसंतराव नाईक जयंतीनिमित्त 'कृषी दिन' साजरा:महायुती सरकारला विसर पडल्याची काँग्रेसची टीका
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महायुती सरकारवर ‘महाराष्ट्र कृषी दिना’चा विसर पडल्याची टीका केली आहे. दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘कृषी दिन’ साजरा केला जातो. पुणे येथील काँग्रेस भवन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ही टीका केली. तिवारी यांनी सांगितले की, वसंतराव नाईक हे संयुक्त महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री…