Headlines

Admin

पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस:TET पेपरफुटीवरून पुन्हा गदारोळाची शक्यता

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. काल पाचव्या दिवशी टीईटी (TET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या जोरदार गदारोळानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. “टीईटी पेपरफुटीचा गुन्हा अत्यंत संवेदनशील असून, या प्रकरणाची व्याप्ती पाहता थेट ‘SIT’ (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे. या घोटाळ्यात जे कोणी दोषी आढळून…

Read More

फडणवीसांचे वागणे 'घटनाद्रोही' अन् 'रामद्रोही; म्हणूनच 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू झालं:शिंदे गटामुळे फडणवीस महाराष्ट्रात पदावर राहतील की नाही, अशी परिस्थिती– संजय राऊत

ओमराजे निंबाळकर हा माणूस सोंगाड्या आहे. त्यांनी खरे बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना ज्या खासदारांना भेटी देत नाहीत, निधी देत नाहीत पण पक्षांतर करताच त्यांचे कामे मंजूर करतात हा घटनेशी द्रोह आहे हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वागणार असतील तर ते घटना द्रोही आणि रामद्रोही आहेत. यामुळेच ऑपरेशन देवेंद्र…

Read More

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे धक्कादायक खुलासे

पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत. पुण्यात राहणाऱ्या जोधपूरच्या चेतनच्या काही मित्रांनी सांगितले की, चेतनच्या वडिलांच्या दुकानासमोर सिया गोयलच्या वडिलांचे कार्यालय होते. तो कॉलेजमध्ये शिकत असताना क्रिकेट खेळताना सियाचा भाऊ साहिलच्या संपर्कात आला. यानंतर सियाशी मैत्री झाली. त्या…

Read More

वसमतमध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त:अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात 1.36 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

वसमत शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी ता. 29 दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1.36 लाख रुपयांचा गुटखा व दुचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासन हिंगोली येथील अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे यांना वसमत शहरात प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:सियाचा भाऊ साहिलला 10 कोटींची कायदेशीर नोटीस; 'सियाचा वकील कोण?' यावरून कोर्टात रंगला वाद

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवे कायदेशीर वळण मिळाले आहे. लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्याच्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेली सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल मोठ्या अडचणीत सापडला आहे. सियाचे वकील असल्याचा दावा करणारे अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी आता साहिलला थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. या…

Read More

‘जय जय विठ्ठल’च्या गजरात निवृत्तिरायांचे पंढरीकडे प्रस्थान:60 दिंड्या, हजारो वारकरी, चांदीचा भव्य रथ आणि भक्तिमय वातावरणाने त्र्यंबकनगरी दुमदुमली

आषाढी वारीला भक्तिभावाचे उधाण आले असून श्री संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी सोमवारी (२९ जून) त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेने मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’, ‘राम कृष्ण हरी’ या अखंड नामघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात हजारो वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला. यंदा 60 दिंड्यांसह हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी…

Read More

राम मंदिर चोरी- अयोध्येत UP काँग्रेस अध्यक्ष नजरकैदेत:पत्नी म्हणाली- अधर्मी भाजप सरकारकडून जीवाला धोका; ट्रस्टला घेरणार होते

अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजता अयोध्या येथील एका हॉटेलमध्ये नजरकैद केले. अजय राय यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ देणगी चोरीचा निषेध करण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी आज म्हणजेच मंगळवारी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा केली होती. त्यामुळे, ते रात्रीच अयोध्याला पोहोचले…

Read More

राहुरीत ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा शिवसेनेत प्रवेश:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल‎

शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल . जिल्हा प्रमुखपदावरून हटवल्यानंतर खेवरे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. राहुरी तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि…

Read More

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला थेट राष्ट्रीय सन्मान!:शिक्षक लहू बोराटेंच्या कष्टांना छत्तीसगडमध्ये फळ; जि. प. शाळेच्या गुणवत्तेला “योगेश स्मृती पुरस्कार”‎

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेच्या समृद्ध आणि रचनात्मक शैक्षणिक कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सक्रिय व प्रतिष्ठित ‘अग्रज नाट्य दल संस्थेच्या वतीने आयोजित योगेश स्मृती . बिलासपुर येथील सीआयएमएस ऑडिटोरियममध्ये २६ ते २९ जून २०२६ दरम्यान हा सोहळा झाला. विशेष गौरव समारंभात बिलासपूरचे समाजसेवक व…

Read More

आढावा बैठक:इतके निष्क्रिय अधिकारी प्रथमच पाहतोय, काम शासनासाठी करता की ठेकेदारांसाठी

अकोले तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी प्रशासनाचे वाभाडे काढले. “इतके निष्क्रिय अधिकारी मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तरी प्रशासनाला फरक पडत नाही. अधिकारी सरकारसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी?” अशा शब्दांत विखे पाटलांनी आपला संताप व्यक्त केला. येथील विठ्ठल लॉन्सवर आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते…

Read More