बालविवाहाची अनिष्ट प्रथा करंदीतून कायमची हद्दपार:गाव बालविवाहमुक्त करण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार, आता प्रत्येक मुलगी शिकणार
जिथे काही वर्षांपूर्वी विवाहाच्या अक्षदा पडताना वयाचा विचार दुय्यम असायचा, त्याच पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक करंदी गावाने बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. आमच्या गावात आता एकही बालविवाह होणार नाही, उलट प्रत्येक मुलीच्या हाती शिक्षणाची पाटी असेल,’ असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ‘स्नेहालय’ संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाच्या सोबतीने गावाने प्रत्यक्ष कृती आराखडा…