Headlines

Admin

निर्णयक्षमता गमावलेल्या आजच्या तरुण पिढीला भागवत ग्रंथ हाच मोठा आधार:ज्येष्ठ ब्रह्मचारी रेवतीनंदन दास यांचे निरुपण, श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात‎

आजची तरुण पिढी अनेक बाबतीत संभ्रमात असून आपली निर्णयक्षमता गमावून बसली आहे. अशा भरकटलेल्या युवकांना दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनात स्थैर्य आणण्यासाठी ‘श्रीमद् भागवत ग्रंथ’ हाच खरा मोठा आधार वाटतो, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यां . येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते…

Read More

गोवंश हत्या बंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय:आमदार सदाभाऊ खोत यांचा महायुती सरकारला थेट इशारा‎

गाई, म्हशी, पाळणाऱ्या शेतकऱ्यांची मते नको सरकारला आहेत का ? सरकारला फक्त जाती पातीचीच मते हवी आहेत का ? गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आधार घेऊन, काही लोक हे बाजार बंद पाडायला लागले आहेत. नेमकं यातून काय साध्य करायचं आहे हे सरकारने स्पष्ट करावे, गोवंश हत्या कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय , हे तुम्हाला महागात…

Read More

वीजपुरवठा सततचा खंडीत, पिकांचे नुकसान:6 तास विनाअडथळा विजेचे ‎आश्वासन; आंदोलन मागे‎

सततच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ढोराळे, इर्ले आणि मानेगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तडाखेबंद उन्हामुळे आधीच पिके संकटात सापडली असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेकडो शेतकऱ्यांनी हातात कुलूप घेऊन थेट वैराग येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी…

Read More

‘स्वाभिमानी’कडून निमगाव पाटी येथे परिपत्रकाची होळी:शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांवर कारवाईचा निषेध‎

मानेगाव येथे शक्तिपीठ महामार्ग जमिनीची मोजणी करताना विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर कारवाई केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निमगाव पाटी येथे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने शासनाच्या परिपत्रकाची होळीही करण्यात आली. शक्तिपीठ महामार्गला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत असतानाही शासनाने त्यास न जुमानता या बाधित जमिनींच्या उताऱ्यावर या महामार्गाच्या नोंदी केल्या. एवढेच…

Read More

शेतकरी नरमले, पोलिस बंदोबस्तात मोजणी‎:शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनासाठी मानेगावात मोजणी सुरु, गुन्हे दाखल झाल्याने शेतकरीवर्ग भयभीत‎

. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पांतर्गत वैराग परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या ट्रम्पेटमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक काळ्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण होणार आहे. त्यामुळे ट्रम्पेटची जागा बदलण्यासाठी ठोस प्रयत्न करू, अशी ग्वाही मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी शेतकऱ्यांना दिली. दोन मोठे महामार्ग एकमेकांना जोडणारा आणि गाड्यांना दिशा बदलण्यासाठी बनवला जाणारा एक फ्लायओव्हर (उड्डाणपूल) आणि वर्तुळाकार…

Read More

पॉस मशीनद्वारे विक्री असूनही बार्शीत युरियाचा मेळ बसेना:शेतकरी हैराण, पारदर्शकतेला युरिया, डीएपी खतांच्या कृत्रिम तुटवड्यापुढे कृषी विभाग हतबल‎

रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी खत दुकानात पॉस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणाद्वारे खतांची विक्री बंधनकारक करण्यात आली. खत विक्रीचे डिजीटली ट्रॅकींग होत असल्याने दुकानातील खतांचा साठा समजणे सोपे झाले आहे. परंतु, बार्शी तालुका मात्र याला अपवाद असल्याचे द . सन २०१८ पासून डीबीटी प्रणाल सर्वत्र टप्प्याटप्प्याने राबवण्यात आली. खतांच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत किरकोळ…

Read More

भगवानबाबांना आपलं म्हणा, ते स्वीकार करतीलच:डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भाविकांना भावनिक आवाहन‎

ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी ६६ वर्षांपूर्वी अकोला गावात अखंड हरिनाम सप्ताहाची पावन परंपरा सुरू केली होती. बाबांना तुम्ही फक्त मनापासून आपलं म्हणा, ते तुमचा स्वीकार केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत, असे भावस्पर्शी उद्गार श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी काढले. पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे अधिकमासानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी सांगता…

Read More

‘ऑपरेशन सिंदूर हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार',

प्रतिनिधी | अहिल्यानगर स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर राष्ट्ररक्षण, विज्ञाननिष्ठता आणि भारताच्या आधुनिक युद्धनीतीचा दूरदृष्टीने विचार करणारे युगपुरुष होते. त्यांनी मांडलेले ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे विचार आजच्या सशक्त आणि शस्त्रसज्ज भारताच्या रूपाने प्रत्यक्षात साकार होत आहेत. भारताने अलीकडे यशस्वीरित्या पार पडलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार आहे, असे प्रतिपादन…

Read More

Wildlife protection in the wild is valid

Marathi News National Wildlife Protection In The Wild Is Valid Supreme Court, Removing Animals From A Safe Environment Is Cruelty दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक गुजरातच्या जामनगर येथील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनताराला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने वनताराशी संबंधित प्राणी आयात आणि संरक्षण कार्यांवर लागलेले सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले आहे…

Read More

मुंबईच्या लोकलसह अणुऊर्जा केंद्र उडवण्याचा कट उधळला:मुंब्रा, कुर्ला व पुण्यातील 8 दहशतवाद्यांना बेड्या

मुंबई, पुणे आणि पंजाबमध्ये रक्तपात घडवण्याचा पाकिस्तानचा भीषण कट पोलिसांनी हाणून पाडला. दाऊद इब्राहिमचा कुख्यात हस्तक मुन्ना झिंगडा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर स्फोट घडवण्यासाठी सज्ज असलेल्या तब्बल आठ दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने अटक केली आहे. या कारवाईत मुंबईतील मुंब्रा व कुर्ला आणि पुण्यातील एका दहशतवाद्याचा समावेश असून, त्यांनी मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेल्या दादर…

Read More