Headlines

खंडोबारायांच्या सासुरवाडीत ‘अधिकमास’ सोहळा:16 जावयांच्या हस्ते धोंडे पूजन; जागरण-गोंधळ अन् पारंपारिक गीतांनी वातावरण भक्तिमय

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबादेवाच्या सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे अधिक मासानिमित्त एक आगळावेगळा धार्मिक उपक्रम पार पडला. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिरात आयोजित धोंड्याच्या कार्यक्रमात खंडेरायांना धोंड्यासह पंचपक्वान्न मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच नेवासा बुद्रुक तीर्थक्षेत्रातील उपस्थित १६ जावयांचा विशेष सत्कार करून त्यांच्या हस्ते धोंड्याची पूजा करण्यात आली. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजी…

Read More

खरवंडी कासार बंद:चोऱ्यांविरोधात नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सशस्त्र दरोड्यांच्या घटनांसह वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला आळा घालावा, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावावा आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी या मागण्यांसाठी शुक्रवारी खरवंडी कासार बाजारपेठ बंद ठेवून नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. तीन दिवसांपूर्वी परिसरात दोन ठिकाणी सशस्त्र दरोड्याच्या घटना घडल्या होत्या….

Read More

Sandeep Deshpandes Direct Question to Jain Society on White Stripes Science

मुंबईतील रस्त्यांवर जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता अधिकच राजकीय स्वरूप धारण केले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा जैन समाजावर आणि या प्रथेला समर्थन देणाऱ्या . मुंबई आणि उपनगरांमधील काही भागांत जैन साधू-साध्वींना अनवाणी चालताना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यांवर पांढरे पट्टे रंगवण्यात आले होते. मात्र…

Read More

अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटमध्ये 1 लाख भाविक:पहाटेपासूनच वटवृक्ष स्वामी मंदिर परिसर गजबजला; वाहनांच्या लांबच लांब रांगा‎

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सलग सुट्याचा शेवटचा दिवस, शनिवार, रविवारी यामुळे पहाटेपासून दिवसभर सुमारे एक लाखपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे ५ वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. उन्हाळी सुट्टी व अधिक मास शेवटचा दिवस, शनिवार रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती…

Read More

सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणी!:'MIFF 2026' निमित्त मुंबईत रंगणार 19 निवडक मराठी लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक १९ लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १६ ते २० जून दरम्यान पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात नियमित संध्याकाळी ६.३० वाजता महोत्सव रंगणार आहे. केवळ १९ जून रोजी ४ ते…

Read More

'मालिका संपली, पण गोष्ट थांबणार नाही':अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' पुन्हा येणार!

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेचा प्रवास १४ जून रोजी थांबला असला, तरी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या विचारांची गोष्ट थांबणार नसल्याची मोठी घोषणा अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. मालिका अचानक बंद झाल्यानंतर राज्यभरातून उमटलेल्या प्रतिक्रियांमध्ये आता अमोल कोल्हे यांनीच प्रेक्षकांना दिलासा देत, “ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे,” असे स्पष्ट संकेत…

Read More

"माझ्याकडून असा अन्याय कधीच होणार नाही":मनोज जरांगे पाटील ठाम, 'राज्यातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत लढत राहणार'

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला आणि समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “राज्यातील एका भागाला आरक्षण आणि दुसऱ्या भागाला नाही, असे माझ्याकडून कधीही होणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत मी…

Read More

नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद दिला नाही तर कारवाई अटळ:मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांचा इशारा, पावसाळी तयारीचा घेतला आढावा‎

नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यात जर कोणी टाळाटाळ केली तर कारवाई अटळ असल्याचा इशारा मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरात पावसाळी तयारीचा आढावा घेताना दिला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आयुक्तांनी नुकतीच शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू…

Read More

नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मोर्शी कॉलनीत पाणी टंचाई:नागरिकांचे नगराध्यक्षांना साकडे; आंदोलनचा दिला इशारा‎

मोर्शी येथील नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कॉलनी परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कॉलनी परिसरात सध्या अनियमित व अशुद्ध (गढूळ) पाण्याचा पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांसह परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक देत एक निवेदन नगराध्यक्ष प्रतीक्षाताई गुल्हाने यांना सादर केले. दरम्यान येत्या पाच दिवसात कॉलनीवासियांना मुबलक आणि शुद्ध…

Read More

शब्द पाळा, नाहीतर रस्त्यावरची मोठी लढाई:आंदोलन स्थगित करत रोहित पवारांचा सरकारला इशारा, 22 जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात सुरू केलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत सरकारच्या वतीने शिष्टाई केली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन…

Read More