Headlines

मालेगावला एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू:पतीचा मृतदेह टॉवरवर, तर पत्नीसह 2 मुलांचे मृतदेह विहिरीत सापडले

मालेगाव तालुक्यातील तिवळी (जि. वाशिम) येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संतोष तुकाराम बकाल (३८) यांचा मृतदेह शेतातील विद्युत टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी वर्षा (३४), मुलगी जान्हवी (८) आणि मुलगा सोहम (४) यांचे मृतदेह विहिरीत आढळले. संतोषकडे…

Read More

जलसंपदा मंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश:31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करा: राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सिंचन भवन येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे…

Read More

अचलपुरात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले दालनाची मागणी:नगरसेविका अपर्णा रोडेंनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रेरणादायी दालन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका अपर्णा जितेंद्र रोडे यांनी ही मागणी केली असून, त्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन सादर करताना आमदार प्रवीण तायडे, नगराध्यक्ष रूपाली माथने आणि सुधीर रसे यांच्यासह अनेक मान्यवर…

Read More

शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल- लक्ष्मीकांत देशमुख:गांधी दर्शन शिबिरात माजी सनदी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन

छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे संविधानातील समतेकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल ठरले, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेल्या ३२ व्या गांधी दर्शन शिबिरात ते बोलत होते. गांधी भवन, कोथरूड येथे रविवारी झालेल्या या शिबिरात देशमुख ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’…

Read More

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून जेजुरी विकासासाठी सूचना:सेंद्रिय हळद, भक्तनिवास, कॉरिडॉरची गरज; देवस्थानला पुढाकार घेण्याचे आवाहन

शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराला भेट देऊन विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी जेजुरी देवस्थानच्या प्रगती आणि विकासासाठी अनेक सूचना केल्या, ज्यात सेंद्रिय हळदीचा वापर, आधुनिक भक्तनिवास आणि वाराणसीच्या धर्तीवर कॉरिडॉर उभारणीचा समावेश आहे. त्यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण व्हावीत, अशी प्रार्थनाही केली….

Read More

नागपूर विद्यापीठातर्फे विदर्भातील पद्मश्रींचा नागरी सत्कार:28 जून रोजी देशपांडे सभागृहात विशेष सोहळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, २८ जून रोजी सिव्हिल लाईन परिसरातील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडणार आहे. या नागरी सत्कार सोहळ्यात विदर्भाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आठ पद्मश्री पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये शंकर बाबा पापळकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम,…

Read More

नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती!:अंबादास दानवेंनी फुंकले ट्रॅक्टर आंदोलनाचे रणशिंग; मराठवाड्यात मंगळवारी आंदोलन

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हिंगोली जिल्हा दौऱ्यात सरकाराच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात मंगळवारी ता. १६ सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे,. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्यासाठी हे आंदोलन छेडले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी ता. १४ बैठक झाली….

Read More

माळशिरस येथे पिकप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू:विहिरीला कठडा नसल्याने भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

सोलापूर येथील माळशिरस येथे पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या बाजूलाच ही विहीर होती आणि या विहिरीत पिकप गाडी कोसळून यात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले असून ही गाडी विहीरीच्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ हा भीषण…

Read More

स.प. महाविद्यालयाची भाविका भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार:19 वर्षांखालील महिला संघाचे नेतृत्व करणार, महाविद्यालयाचा गौरव

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची इयत्ता १२ वीची विद्यार्थिनी भाविका अहिरे हिची १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. ती बंगळूरु येथील क्रिकेट अकादमीमध्ये रुजू होऊन श्रीलंका संघासोबतच्या आगामी दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयात भाविकाचा सत्कार करण्यात आला. शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल यांच्या हस्ते हा सत्कार…

Read More

पहिल्याच पावसात शासनाच्या गोदामातील हरभरा भिजला:अशा दुर्घटना होतच असतात, व्यवस्थापकिय संचालकांची संतप्त प्रतिक्रिया

हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामावरील पत्रे उडाल्याने सुमारे ४ हजार मेट्रीक टन हरभरा पिक भिजल्याचे चित्र आहे. यातून शासनाने तब्बल २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदोष गोदाम भाडेतत्वावर घेतल्याने हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वखार महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक कैस्तूभ दिवेगावकर यांनी अशा घटना घडतच असतात…

Read More