Headlines

आरोग्य विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:‘अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, पण आम्हाला सहआरोपी करू नका’

अल्पवयीन मातांची धक्कादायक प्रकरणे उघडकीस आली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. याविषयी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका आरोग्य विभागाने आम्ही अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, मात्र आमची सुरक्षा होणे गरजेचे आहे. तसेच आम्हाला सहआरोपी करू नका, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महापालिकेच्या दवाखान्यात वर्षभरात ८६ अल्पवयीन माता…

Read More

पावसाळ्यात समुद्रात जाणारा 46 % कचरा नदीच्या उगमस्थानीच अडवणार

देशातील एकूण वार्षिक सागरी कचऱ्यापैकी तब्बल ४६% कचरा हा केवळ पावसाळ्यात नद्यांद्वारे समुद्रात प्रवेश करतो. यामध्ये एकट्या गंगा नदीतून दरवर्षी १ लाख २० हजार टन प्लॅस्टिक समुद्रात सोडले जाते. या गंभीर पार्श्वभूमीवर, किनारपट्टीवरील कोरल रीफ (प्रवाळ शैलभित्ती) आणि माशांच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शास्त्रज्ञांनी “डबल-कंपार्टमेंट एंट्रॅपमेंट डिव्हाइस” हे आधुनिक…

Read More

नेवासा- देवगड मार्गावर असलेल्या जंगलात वैद्यकीय कचऱ्याचा खच

नेवासे-देवगड मार्गावरील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शनच्या सुया, औषधांच्या रिकाम्या व फुटलेल्या बाटल्या तसेच वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य यांचा अक्षरशः खच रस्त्यालगत वनविभागात आढळून आला आहे. रुग्णालये व दवाखान्यांमधून निर्माण होणारा वैद्यकीय जैविक कचरा हा अत्यंत धोकादायक मानला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने…

Read More

भाजपसह राष्ट्रवादीचेही सर्व मतदार सहलीला जाणार ‘ठाण्या’मध्ये,:क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी महायुतीकडून संयुक्त उपाययोजना

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीला अवघे चार दिवस उरले असताना, महायुतीमध्ये उडालेला बंडखोरीचा भडका अखेर शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले. मात्र, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, या भीतीने आता महायुतीने आपल्या मतदारांना ‘सहली’वर पाठवण्याचा सुरक्षित मार्ग निवडला आहे. शिवसेनेच्या महापालिकेतील २६ नगरसेवकांसह जिल्ह्यातील नगरपरिषदांचे सदस्य असे १०० हून अधिक सदस्य शनिवारीच ठाणे…

Read More

मृग दारात, पण पाऊस बेपत्ता:पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; भाजीपाला उत्पादकही अडचणीत, सर्वांचे डोळे आकाशाकडे‎

खरीप हंगामाची चाहूल लागली असली तरी पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने घाटनांद्रासह परिसरातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. जूनचा दुसरा आठवडा संपला तरी मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली असून, बळीराजा आता आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. खरीप हंगामातील भरघोस उत्पादनासाठी वेळेत मशागत आणि योग्य वेळी पेरणी होणे अत्यावश्यक मानले जाते….

Read More

मोसंबीला भाव नाही; 450 झाडांवर चालवला जेसीबी:पिंपळगाव पेठ येथील शेतकऱ्यांची चार वर्षांची मेहनत झाली मातीमोल‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील शेतकरी खेमचंद फुले यांनी मोसंबी पिकाला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे आपल्या शेतातील ४५० मोसंबीच्या ओल्या झाडांवर जेसीबी चालवून संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली. २०२१ मध्ये एक हेक्टर क्षेत्रावर मोठ्या अपेक्षेने मोसंबीची लागवड करण्यात आली होती. मात्र चार वर्षे सतत पाणी, खत, औषधे, मजुरी आणि देखभालीवर लाखो रुपये खर्च करूनही बाजारात मोसंबीला…

Read More

40 फुटांच्या विहिरीमधून बिबट्याची केली सुटका:हनुमंतगावला शिकारीच्या शोधात पडला विहिरीत‎

शिकारीच्या शोधात असताना एक बिबट्या ४० फुट विहिरीत पडल्याची घटना वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे रविवारी सकाळी समोर आली. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही बाब वन विभागाला कळवण्यात आली. विहिरीतील मोटरच्या पाइपला मिठी मारून बिबट्या बसला होता. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याची सुटका केली. गट क्रमांक १०१ मध्ये भाऊसाहेब मोईन यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे समोर…

Read More

‘एक जिल्हा एक नोंदणी’ सुविधेचा गैरवापर:फलटणला ‘तुकडेबंदी’ला बगल देत 1545 दस्तांची बोगस नोंदणी, सहदुय्यम निबंधक निलंबित

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील क्रमांक २ चे सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) दीपक सावळा पवार यांच्यावर राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. “एक जिल्हा एक नोंदणी’ या सुविधेचा गैरवापर करून जानेवारी ते एप्रिल २०२६ या ४ महिन्यांत तब्बल १,५४५ दस्तऐवजांची संशयास्पद नोंदणी केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. महसूल व वन विभागाने…

Read More

मालेगावला एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू:पतीचा मृतदेह टॉवरवर, तर पत्नीसह 2 मुलांचे मृतदेह विहिरीत सापडले

मालेगाव तालुक्यातील तिवळी (जि. वाशिम) येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संतोष तुकाराम बकाल (३८) यांचा मृतदेह शेतातील विद्युत टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी वर्षा (३४), मुलगी जान्हवी (८) आणि मुलगा सोहम (४) यांचे मृतदेह विहिरीत आढळले. संतोषकडे…

Read More

जलसंपदा मंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश:31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करा: राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सिंचन भवन येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे…

Read More