Headlines

लासूर स्टेशन बसस्थानकाच्या बांधकामाबाबत निवेदन

लासूर स्टेशन येथे सुरू असलेल्या नवीन बस स्थानकाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लासुरशहर शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सरचिटणीस दिलीप पाटील बनकर यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लासुरस्टेशन येथील बस स्थानकाच्या बांधकामामध्ये दर्जाहीन साहित्याचा…

Read More

हवामान अंदाज:मान्सून 2-3 दिवसांत राज्यातील सर्व विभाग व्यापण्याची शक्यता, सध्या मान्सून कोकणातील हर्णे, बंगालच्या सिलीगुडीत थांबला

भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच असे घडले की, त्याची गती दोन्ही टोकांवर (पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी) थांबली. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत तो वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. लवकरच मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. याशिवाय तो संपूर्ण तामिळनाडू व्यापत ओडिशा आणि छत्तीसगडपर्यंत पोहोचेल. मान्सूनचे पूर्व टोक…

Read More

ठाण्यात ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त:3 कोटींचा चरससह ट्रामाडॉल जप्त, जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना बेड्या

ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. गुजरातच्या एका अट्टल तस्करासह थेट जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि कुपवाडा येथून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत ३ कोटी ३ लाख ५४ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात ३ किलो २० ग्रॅम चरस आणि तब्बल १२,९८४ ट्रामाडॉल कॅप्सुल्सचा…

Read More

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे निर्देश:मतदार पुनरिक्षण मोहीम अचूक, पारदर्शकपणे यशस्वी करा

राज्याचे अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदारांना कोणताही त्रास न देता, प्रशासनाने सर्व घटकांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करत ही मोहीम यशस्वी करावी, असे ते म्हणाले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेच्या आढावा…

Read More

वेरूळचा विकास म्हणजे स्वच्छता व पुनर्वसन:जिल्हाधिकारी विनय गौडा यांची ग्वाही; पिंपरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट

जगप्रसिद्ध वेरूळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विकास म्हणजे केवळ मोठमोठ्या इमारती व लक्झरी घरे नव्हे, तर स्वच्छ परिसर, शुद्ध वातावरण आणि मन प्रसन्न करणारे शहर म्हणजे खरा विकास होय, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज वेरूळ येथे मांडली. नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी गौडा यांनी वेरूळला भेट देऊन स्थानिक दुकानदारांसोबत बैठक घेतली….

Read More

अर्भक मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा भोवला:एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत, एकाची वेतनवाढ थांबवली; सीईओंचे आदेश

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेस रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणाच्या कारणावरून एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत करण्यात आला असून एकाची वेतनवाढ थांबविण्यात आली तर चालकास कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील एक गरोदर…

Read More

'ऑपरेशन ब्लू स्टार'वरून गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात:केंद्रीय नेतृत्वाची व संघाची नाराजी, तर देवेंद्र फडणवीसांकडून बचाव!

पंजाबमध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या कारवाईचा ‘काळा दिवस’ असा उल्लेख केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाजनांची ही भूमिका निव्वळ वैयक्तिक असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट करत, कदाचित त्यांना या विषयाची पूर्ण माहिती नसल्याने त्यांच्याकडून असे विधान झाले असावे,…

Read More

तोतया पोलिसाने शेतकाऱ्याला लुटले:56 हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास, गुन्हा दाखल; हिंगोलीतील घटना

हिंगोली ते सेनगाव रोडवर सवड शिवारात एका तोतया पोलिसाने शेतकऱ्याची फसवणूक करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध बुधवारी ता १० गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील रहिवासी असलेले शेतकरी गोविंद लक्ष्मण मूटकुळे मंगळवारी ९ कामा निमित्त हिंगोली येथे…

Read More

तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस..:उसाच्या पंचनाम्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची कृषिमंत्री भरणेंकडून थट्टा? VIDEO

नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजाची लोकप्रतिनिधींकडून कशी थट्टा केली जाते, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकवासला परिसरातील जळालेल्या उसाच्या पिकाचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी, या आशेने कृषिमंत्र्यांच्या दारात पोहोचलेल्या एका हताश शेतकऱ्याची राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थट्टा केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल…

Read More

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट:महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण, राज्यभरातून हळहळ व्यक्त

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ग्रेनेड स्फोट झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आल्याची माहिती आहे. नवी मुंबई आणि साताऱ्यातील दोन्ही जवानांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या कमलकोट भागात मंगळवारी सायंकाळी अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या दुर्घटनेत भारतीय लष्करातील दोन जवान गंभीर जखमी झाले….

Read More