Headlines

पुणे विधान परिषद निवडणूक:काँग्रेसमध्ये खदखद! अरविंद शिंदेंची थेट हायकमांडकडे धाव; प्रदेशाध्यक्ष सपकाळांविरोधात तक्रार

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे धाव घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे पुणे काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावरही…

Read More

उजनी धरण ठरतेय समृद्ध मत्स्यसंपदा अन् जैवविविधतेची ‘जीवदायिनी’:केत्तूर, पारेवाडी जवळील पाच पूलाजवळील घटना

उजनी जलाशयातील समृद्ध मत्स्यसंपदा आणि जैवविविधतेचे आणखी एक महत्त्वपूर्ण उदाहरण समोर आले आहे. केत्तूर, पारेवाडी (ता. करमाळा) जवळील पाच पूलाजवळ चांडगाव (ता. इंदापूर) परिसरात स्थानिक मच्छीमार योगेश खानेवाले यांच्या जाळ्यात तब्बल २५ किलो वजनाचा कटला मासा अडकला. एवढ्या मोठ्या आकाराच्या माशाची नोंद झाल्याने मत्स्य व्यवसाय क्षेत्रासह मत्स्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उजनी धरणाला सोलापूर, पुणे…

Read More

नवले पुलावर मध्यरात्री पुन्हा भीषण अपघात:सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा जागेवरच मृत्यू, दोघे जखमी- VIDEOS

पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सर टँकरवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे टँकर रस्त्यावर पलटी होऊन थेट समोरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

शिवराज्याभिषेकदिनी तिवसा येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश:आ. राजेश वानखडे यांच्या हस्ते वृक्षारोपण; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन‎

सध्याच्या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यामुळे पर्यावरण संतुलनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. कोरोनानंतरच्या काळात स्वच्छ, निरोगी, हरित पर्यावरणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक . तिवसा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ. राजेश वानखडे यांच्याहस्ते श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या प्रस्तावित जागेवर (श्रीजीत मंगल कार्यालयाजवळ) वृक्षारोपण करण्यात आले….

Read More

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प:जिल्ह्यामध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनासह अन्य प्रक्रियेला मिळणार गती

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीत दिला. सिंचन प्रकल्पांमधूनही पाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षीच संघर्ष करावा लागतो. सर्वाधिक संघर्ष हा मोठा प्रकल्प…

Read More

परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही:कठोर कारवाईची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात‎

नीट पेपरफुटीचे पडसाद उमटणे सुरुच असून, परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानने दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नीट पेपरफुटीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र…

Read More

घरांची छप्परे उडाली, संत्रा बागांचे अतोनात नुकसान,:उंबरखेड, भारसवाडीत वादळी वाऱ्याचा बसला तडाखा, शेतकरी आणि ग्रामस्थ झाले हवालदिल‎

मृग नक्षत्र उजाडूनही कडक उन्हाची तीव्रता कायम असल्याने नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच सोमवारी ८ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड आणि भारसवाडी परिसरात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने प्रचंड थैमान घातले. या वादळाचा सर्वाधिक फटका उंबरखेड आणि भारसवाडी गावांना बसला असून, शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे….

Read More

शैक्षणिक साहित्यांचे भाव 10%वधारले अन् पालकांवरील आर्थिक ताण वाढला:दोनशेचे दप्तर यंदा तीनशे रुपयांवर; वॉटर बॉटलचा दर 300 ते 1000 रुपये‎

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे नामवंत कंपन्यांच्या तसेच लोकल निर्मिती असलेल्या विविध कलरच्या सॅक, दप्तरे, वह्या, पाणी बॉटल, टिफीन बॉक्स आदी शैक्षणिक साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. यंदा वेगवेगळे शैक्षणिक साहित्य १० ते २५ टक्के . गेल्यावर्षी ४४० रुपये डझन असणाऱ्या वह्या आता ४८० रुपयांवर गेल्या आहेत. दोनशे रुपयांचे दप्तर ३०० रुपयांना…

Read More

एक वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 98 रुग्णांना वैद्यकीय मदत:संगमनेरातील रुग्णांना 1 कोटींचे अर्थसहाय्य- आ. खताळ‎

संगमनेर मतदारसंघातील सर्वसामान्य, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळवून देण्यात आमदार अमोल खताळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून मागील एका वर्षात ९८ रुग्णांना १ कोटींच्या आसपास वैद्यकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला…

Read More

जीवनात एकदा तरी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे वाचन व पारायण- देविदास महाराज म्हस्के, नेवाशात ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्याची सांगता, भाविकांची मोठी गर्दी‎

येथील ऐतिहासिक व पवित्र श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी चिंतन (स्थितप्रज्ञदर्शन) सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी, प्रत्येक मनुष्याने मनात पवित्र भाव ठेवून जीवनात एकदा तरी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे वाचन व पारायण करावे, असे आवाहन केले. पुरुषोत्तम अधिक मासाचे औचित्य…

Read More