Headlines

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर:कोकण, घाटमाथा, विदर्भासह अनेक भागांना अलर्ट, धरणसाठ्यातही मोठी वाढ

राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन…

Read More

‘कंत्राटीं’ना दिलासा देण्याचा प्रयत्न; 47 कामगारांची सेवा अटींवर बहाल!:अपात्र तरी मानवतेच्या दृष्टीने अनुभव लक्षात घेता मिळाली संधी‎

. सुरक्षेसह, सुविधा नियमितपणे मिळाव्यात या उद्देशाने मनपातील ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अस्थायी आस्थापनेवर आणण्याचे प्रयत्न मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत. कारण, गेल्या १० ते १२ वर्षांपासून मनपाच्या विविध विभागात टंकलेखक तसेच संगणक ऑपरेटर पदावर कार्यरत ४७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसल्याने ते काम करण्यास पात्र नाहीत, असे कारण देत तत्काळ कामावरून कमी करण्यात आले…

Read More

मुळा धरणात 16 टीएमसी पाणी; तरी खरिपाचे आवर्तन अधांतरी!:हलक्या सरींमुळे खरीपाच्या पिकांना अंशतः आधार‎

महिनाभरात घाटमाथ्यावर अर्थात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तर मुळा धरणाचा जलसाठा १६ टिएमसी झाला आहे. त्यामुळे धरणांतील उपसा सिंचन सुरू करण्यात आले. परंतू एलनिनो सावटामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेऊन सिंचन योजनांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे खरिपात गरज असूनही कालव्यांचे आवर्तन मात्र रखडले…

Read More

धुळेप्रमाणे नाशिकलाही समान विमा दर द्या:भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांची निवेदनाद्वारे मागणी‎

प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेंतर्गत धुळे व नाशिक जिल्ह्यात पीकविमा हप्त्यात मोठी तफावत असल्याचा दावा करत, धुळे जिल्ह्याप्रमाणेच नाशिक जिल्ह्यासाठीही एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी मित्र तथा भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्ताजी भरणे आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्याकडे केली आहे. खरीप…

Read More

मनमाड कृउबा सभापतिपदी धात्रक:तालुक्यात आमदार कांदे यांचे प्राबल्य असताना सभापती भाजपचा‎

मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदी माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे कार्यकर्ते गणेश धात्रक यांची अविरोध निवड झाली. तालुक्यात आमदार सुहास कांदे यांचे प्राबल्य असताना बाजार समितीमध्ये भाजपचे धात्रक यांची निवड झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. संचालकांची सभा बाजार समितीच्या सभागृहात बोलवण्यात आली. सिन्नर येथील सहाय्यक निबंधक संजय गिते हे प्राधिकृत अधिकारी होते. सभेला १७ सदस्यांपैकी सत्ताधारी गटाचे…

Read More

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 60%; गेल्या चोवीस तासांत 7 टक्क्यांनी वाढ:गेल्यावर्षी याच दिवशी 80 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता‎

जायकवाडी धरणात पाण्याची भर सोमवारीही कायम राहिली असून धरण आता ६० टक्के उपयुक्त जलसाठ्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त जलसाठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला असून ४४.५५ टीएमसी (१२६१.७९६ दलघमी) जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. वरच्या धरण साखळीतून सुरू असलेल्या विसर्गामुळे नाथसागराकडे ५६ हजार २९० क्युसेकची आवक कायम असून पुढील काही दिवसांत जलसाठा…

Read More

महाराजस्व अभियान:सहा दिवसांत 3,436 महिलांना मिळाला शेतकऱ्याचा दर्जा, नागपूर विभाग राज्यभरात अव्वल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना’ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या पहिल्या सहा दिवसांत महसूल विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलत तब्बल ३,४३६ महिलांच्या नावे जमिनीची नोंद करून त्यांना ‘शेतकरी’ पदाचा अधिकृत दर्जा बहाल…

Read More

कोल्हापूर, सांगलीसाठी 3,200 कोटींचा आराखडा:सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती, नागरिकांना दिलासा

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या पुराच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३,२०० कोटी रुपयांच्या पूर व्यवस्थापन मोहिमेची घोषणा केली. महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश पावसाच्या पाण्याची साठवणूक वाढवणे आणि कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे हा आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये फडणवीस…

Read More

"मतं मागता आणि निवडून आल्यावर लोकांचीच डोकी फोडता?":मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंना फटकारले, वकिलांनाही सुनावले

डोंबिवलीत एका महिला डॉक्टरसह अन्य डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना तत्काळ जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे तूर्तास तरी म्हात्रे…

Read More

दर्यापूर न.प. महिला व बालकल्याण विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर:विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन

दर्यापूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे नुकतेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे शिबिर पार पडले. महिला व बालकल्याण उपसभापती मंगला तराळे यांनी शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी नगरसेवक प्रदीप मलिये आणि नगरसेविका रमा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती मंगला तराळे यांनी उपस्थित महिलांना नगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या…

Read More