Headlines

जामनेरातील फर्निचर दुकानाला रात्री आग‎:जामनेरातील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलातील घटना; रात्री उशिरा आगीवर मिळवले नियंत्रण

शहरातील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलात असलेल्या एका फॉर्म अँड फर्निचरच्या दुकानाला गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजे दरम्यान लागली. या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. . आकाश शार्दुल यांचे येथील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलात घरातील सजावटीसाठी लागणारे पडदे, फोनच्या गाद्या, फायबर दरवाजे, फेविकॉल, टेस्टिंग साठी लागणारे केमिकल अशा साहित्याचे दुकान आहे….

Read More

देशहितासाठी संशोधन करा:कुलगुरू डॉ. बारहाते यांचे संशोधन मार्गदर्शक कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आवाहन

विद्यार्थ्यांनी देशहित डोळ्यासमोर ठेवून संशोधन करावे आणि त्याची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘संशोधन मार्गदर्शक अभिमुखता’ कार्यशाळेत ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. विद्यापीठाचा गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती….

Read More

प्रो. शंकर बुंदेले यांना सर्वोत्कृष्ट ज्योतिषाचार्य पुरस्कार:दिल्ली येथील ज्योतिष स्टार संस्थेकडून सन्मानित

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. शंकर बुंदेले यांना ‘सर्वोत्कृष्ट ज्योतिषाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील ‘ज्योतिष स्टार संस्थान’ने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात देण्यात आला. विख्यात ज्योतिषाचार्य अनिल वत्स यांच्या हस्ते प्रोफेसर बुंदेले यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात…

Read More

अमरावती पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण:47 प्रतिसाद किटचे वाटप, तात्काळ मदतीसाठी सज्ज

अमरावती जिल्ह्यात आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा उद्देश जीवित व वित्तहानी टाळणे हा आहे. या प्रशिक्षणात शहर आणि ग्रामीण दोन्ही पोलीस दलातील शिपाई सहभागी झाले होते. यावेळी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या ४७ ‘आपत्ती प्रतिसाद…

Read More

आमदार-खासदारांची पेन्शन कायमची बंद करा!:मनसेच्या माजी आमदाराची मागणी; करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्याचे आवाहन

देशाच्या राजधानीत सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या विषयांवर चर्चा रंगली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाची मागणी केली आहे. “माजी खासदार आणि माजी आमदारांना दिली जाणारी पेन्शन योजना कायमची बंद करावी,” अशी मागणी करत त्यांनी राजकीय…

Read More

राज्यातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या:जी. श्रीकांत 15 दिवसांतच पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये, विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार

राज्य प्रशासनामध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदली केल्यानंतर आज (१६ एप्रिल) पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ४ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महसूल, सिडको आणि जीएसटी विभागातील प्रशासकीय…

Read More

निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा:ईव्हीएम पडताळणीवरून काँग्रेस नेते नसीम खान आक्रमक

मागील काही वर्षापासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, EVM मधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे….

Read More

नारी शक्ती विधेयकाच्या चर्चेवेळी लोकसभेत गदारोळ:आदित्य ठाकरेंचे नाव घेतल्याने अरविंद सावंत आक्रमक, सुप्रिया सुळेंचाही तीव्र आक्षेप

केंद्र सरकारने महिला आरक्षणासाठी आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या भाषणादरम्यान एका सत्ताधारी खासदाराने आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. यावर संतापलेल्या अरविंद सावंतांनी, “मी तोंड उघडले तर तडीपार आणि गोध्रा हत्याकांडही…

Read More

पुण्यात भाजपमध्येच ठिणगी:3 कोटींच्या टेंडरवरून नगरसेविका आमनेसामने; महापालिकेतच गोंधळ, थेट हाणामारीची वेळ

पुणे महापालिकेत ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचे चित्र समोर आले आहे. यावेळी हा वाद विरोधकांमध्ये नसून सत्ताधारी भाजपच्या गोटातच उफाळून आला आहे. बाणेर परिसरात उभारण्यात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींसाठीच्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेच्या इमारतीतच जोरदार वाद झाला. या घटनेमुळे महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून, सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात…

Read More

शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश:सरकारचा मोठा निर्णय, जड गोण्या बंद

राज्यातील माथाडी कामगारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कांदा, बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक ठिकाणी जड गोण्यांची चढउतार करताना कामगारांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात…

Read More