Headlines

'आधी शिक्षणमंत्री, नंतर थेट प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागणार':आझाद मैदानातून आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा; काय म्हणाले ठाकरे?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार या आगीत भस्म झाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले. तर आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, देशातल्या…

Read More

'हे सरकार या आगीत भस्म झाले पाहिजे':आझाद मैदानातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, अभिजित दीपके यांच्या लढ्यालाही पाठिंबा

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून प्रकृती खालावल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जागी आता दिल्लीच्या आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले असून त्यांना दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत आहे. याच आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतही माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Read More

कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरण:मुंबई हायकोर्टाच्य दणक्यानंतर शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अखेर आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजेरी लावत आत्मसमर्पण केले. डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश…

Read More

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण कार्यक्रम सुरू:'लोक भवन' उद्यानात वर्षभर चालणार निसर्गाची शाळा

नागपूरच्या ‘लोक भवन’ जैवविविधता उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर चालणाऱ्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सेमिनरी हिल्सच्या 49 हेक्टर वनक्षेत्रात हे उद्यान पसरलेले आहे. पूर्वी ते राजभवन जैवविविधता उद्यान म्हणून ओळखले जात असे. हे उद्यान स्थानिक वृक्ष, औषधी वनस्पती, फुलपाखरे, पक्षी…

Read More

खलील शेख आत्महत्या प्रकरण:रवींद्र धंगेकर दाम्पत्य 'नॉट रिचेबल'; अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव, पोलिसांची पथके रवाना

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि लेबर काँट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार असल्याने हे दाम्पत्य सध्या ‘नॉट रिचेबल’ झाले आहे. पोलिसांची विशेष पथके…

Read More

संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा:जिल्ह्यात मुंगशीत प्रवेश, बिटरगावात मुक्काम, प्रशासन अन् पोलिस यंत्रणा सज्ज‎

विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या अखंड गजरात पैठण ते पंढरपूर दरम्यानचा सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास करत पायी दिंडी सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, धाराशिव असा चार जिल्ह्यातून मार्गक्रमण करत रविवारी दु. १२ वा. मुंगशी या गावातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या वैष्णवांच्या मेळ्याचे स्वागत करण्यासाठी मुंगशी आणि परिसरातील भाविक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत…

Read More

उपरी गावामध्ये विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी:आषाढी वारीचे संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत; संत अन् वारकरी वेशभूषेने वेधले लक्ष‎

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे विलासराव देशमुख हायस्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विद्यार्थ्यांची पारंपरिक भक्तिमय दिंडी उत्साहात काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच वारकरी संप्रदायातील विविध पात्रांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात गावभर पदयात्रा करत संपूर्ण परिसर विठ्ठलभक्तीने भारावून टाकला. दिंडीचा समारोप श्री विठ्ठल मंदिरात झाला. यावेळी…

Read More

धक्कादायक:वाशी तालुक्यात शालेय पोषण आहाराच्या सोयाबीन वडीत आढळल्या अळ्या; 301 विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

18 मुलांना शिजवून देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या असल्याचा गंभीर प्रकार शनिवारी(दि.18) तालुक्यातील पारा जिला परिषद शाळेत घडला. या बाबत पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर रात्री साडेआठ वाजता अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल होऊन शाळेत असलेल्या व विद्यार्थ्यांच्या डब्यातील अन्न पदार्थाचे नमुने घेतले आहेत. पारा जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून भात…

Read More

आदिवासींच्या विकासासाठी प्रशासन, सामाजिक संस्थांमध्ये समन्वय पाहीजे:आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे प्रतिपादन‎

मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू दूर करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा व सामाजिक संस्थांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. दोन्ही यंत्रणआंनी योग्य समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशो . चिखलदऱ्याच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली धारणी व चिखलदरा तसेच इतर क्षेत्रातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी…

Read More

बोगस बियाणे, दुबार पेरणीच्या नुकसान भरपाईसाठी ‘अन्नत्याग’:न्यायालयीन लढाईसाठी सत्ताधारी शिंदे सेना करणार सहकार्य‎

बोगस बियाणे व दुबार पेरणीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढल्यास सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे. शेतकरी एल्गार समितीवतीने अन्नदात्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन” पुकारण्यात आले आहे. बार्शीटाकळी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले. या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. बाजारपेठेत…

Read More