Headlines

नव्या पंपांमुळे कन्नडचा पाणीपुरवठा सुरळीत:नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अंबाडी धरणावर रात्रभर जागून बसवले विद्युत पंप‎

कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात असून, अत्यल्प जलसाठ्यामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक अब्दुल जावेद यांनी कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर पाण्यात उभे राहून नवे विद्युत पंप बसवून घेतले आहेत. त्यामुळे आता कन्नडचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, या प्रकल्पात सध्या केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक…

Read More

मुंबईत 70 नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता:नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध याचिका दाखल

मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक निकाल जाहीर होऊन सभागृहाचे कामकाज सुरू झाले असले, तरी प्रत्यक्ष सत्तेच्या गणितावर आता कायदेशीर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्षांच्या ७० हून अधिक नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध निवडणूक याचिका दाखल झाल्यामुळे मुंबईच्या सत्तेचे समीकरण कोणत्याही क्षणी बदलू शकते, अशी चिन्हे आहेत. या न्यायालयीन संघर्षामध्ये शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांविरोधात सर्वाधिक २४ याचिका दाखल आहेत,…

Read More

पाण्याचा सातबारा:राज्यात उभी राहू शकते 25,000 कोटींची नवीन “वॉटर इकॉनॉमी’, पाणी वाचवून ‘ॲक्वा क्रेडिट्स’ मिळवण्याची संधी

महाराष्ट्र हे आधीपासूनच दुष्काळप्रवण प्रदेश आणि “जलयुक्त शिवार’सारख्या महत्त्वाच्या मोहिमा राबवणारे राज्य असल्याने, एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रायोगिक प्रकल्पासाठी (पायलट प्रोजेक्ट) देशात सर्वप्रथम महाराष्ट्राचीच निवड करण्यात आली आहे. “ॲकव्हेरियम’ या जगातील पहिल्या डिजिटल वॉटर बँकेने सादर केलेल्या “पाण्याचा सातबारा’ (वॉटर रेकॉर्ड ऑफ राइट्स) या प्रयोगामुळे राज्यामध्ये तब्बल २५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठी नवी “जल-अर्थव्यवस्था’ उभी राहू…

Read More

Father Kills Daughter Over Inter-Caste Marriage; Arrested

कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात एका विवाहित तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून फरार झालेल्या नराधम वडिलांना बाजारपेठ पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. केवळ मुलीने आपल्या मनाविरुद्ध आणि कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच् . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद वसईकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, गायत्री असे मृत मुलीचे नाव आहे. गायत्रीने काही दिवसांपूर्वी आपल्या…

Read More

जवळा शहापूर पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळला:सर्पमित्राने ‘धामण सराफ’ सापाला सुरक्षित पकडून सोडले

चांदूरबाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये ‘धामण सराफ’ प्रजातीचा साप आढळला. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक सर्पमित्र भूषण काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पोल्ट्री फार्ममध्ये काम सुरू असताना घडली. फार्मचे मालक सुयोग ठाकरे यांच्या पायावरून अचानक साप गेल्याने एकच…

Read More

वडाळीत व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे नागरिक त्रस्त:महावितरणकडे नवीन डीबीची मागणी; महापौरांनीही केली शिफारस

अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक नऊ वडाळी परिसरातील भोईपुरा, अण्णाभाऊ साठे नगर, गुरुकृपा नगर आणि मीनाताई ठाकरे शाळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा अनियमित पुरवठा होत आहे. व्होल्टेजमध्ये सततच्या चढ-उतारामुळे येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांना निवेदन दिले. या…

Read More

मुलांची विक्री करणाऱ्या आईसह तिघांना चंद्रपुरात अटक:महिलेला 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी, मुख्य आरोपी अद्याप फरार

स्वतःच्या दोन मुलांची विक्री करणाऱ्या आणि अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह अन्य दोन महिलांना चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी महिलेला १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी ‘अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग’ (मानवी तस्करी) आणि ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा…

Read More

शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही:साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा – नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की, शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाता आणि इंधनदाता देखील आहे. साखर कारखान्यांनी यापुढे केवळ साखर उत्पादनावरच नव्हे, तर उपपदार्थ निर्मितीवरही अधिक भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) वतीने आयोजित साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) यावरील एक दिवसीय…

Read More

हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरातील 535 मालमत्ताधारकांना नोटीस:मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याचे एसडीओ घुटूकडे यांचे आदेश

हिंगोली शहरातील रिक्षाला बाजार भागात 535 मालमत्ताधारकांना उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी नोटीस बजावली असून मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या नोटीसमुळे परिसरातील नागरिकांमधून एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली शहरांमधील अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी…

Read More

बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा:ओळखीचा गैरफायदा घेत महिलेच्या घरात शिरला, अश्लील मागणी केल्याचा आरोप

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात राजकीय पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्याविरोधात एका ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More