Headlines

बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रांवर धाडसत्र राबवा:वर्ध्यात पुन्हा 'बोगस बियाणे' प्रकरणाची पुनरावृत्ती टाळा, दादाराव केचे यांची सरकारकडे मागणी

लोकप्रतिनिधी हा जनतेचा आणि विशेषतः बळीराजाचा प्रतिनिधी असतो. शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. जर आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायची असेल, तर शेती पिकांना योग्य भाव मिळण्यासोबतच दर्जेदार निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे भाजप नेते दादाराव केचे यांनी म्हटले आहे. तर आगामी पेरणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. दादाराव केचे म्हणाले…

Read More

भोंदू खरात प्रकरण:रुपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी सुनील तटकरेंचे प्रयत्न, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली…

Read More

विकास लवांडेंवरील हल्लेखोरांवर कारवाई करा:शरद पवारांचा पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांना फोन; मुख्यमंत्र्यांनाही भेटणार

वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधात रान छेडल्यामुळे शाईफेक हल्ल्याला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून आरोपींवर कारवाई करण्याची केली. तसेच लवांडे यांना कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्याचीही मागणी केली. शरद पवार हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसोबत…

Read More

44 पैकी 41पोलिस चौक्या बंद; तीनच्या भरवशावर छत्रपती संभाजीनगरची सुरक्षा:‘दिव्य मराठी’च्या पाहणीत वास्तव उघड; अधिकारी म्हणतात, इतर बंदोबस्तात कर्मचारी

छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वर जात आहे. चोऱ्या, लूटमार आणि गोळीबाराच्या घटना घडत आहेत. एकीकडे पोलिस प्रशासन गस्त सुरू असल्याच्या वल्गना करत असताना, ‘दिव्य मराठी’ने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये भलतेच वास्तव समोर आले. नागरिकांच्या तातडीच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या शहरातील 44 पैकी तब्बल 41 पोलिस चौक्या चक्क कुलूपबंद असल्याचे दिसून आले. “साहेब, या बंद चौक्यांच्या दारावर डोके…

Read More

संभाजीनगरमध्ये 40 चार्जिंग स्टेशन; 100 स्टेशनची मनपाची घोषणा फोल:ईव्हींची विक्री 4 वर्षांत 107% वाढली, मात्र 881 वाहनांमागे केवळ एकच चार्जिंग स्टेशन

छत्रपती संभाजीनगर शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) क्रेझ झपाट्याने वाढत आहे, गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ईव्ही वाहनांच्या संख्येत तब्बल 107 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, एकीकडे वाहनांची संख्या सुसाट वेगाने वाढत असताना, दुसरीकडे चार्जिंग सुविधांच्या बाबतीत मात्र शहर अद्याप ‘स्लो ट्रॅक’वरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरात 2022-23 मध्ये 5,435 ईव्ही विक्रीची…

Read More

बिबट्याच्या दहशतीचे झाले ‘रसवंतीगृह’:आळेफाटा परिसरात हटके व्यवसायाची चर्चा‎

आळेफाटा व्यवसायाला नाव देताना अनेकदा देव किंवा कुटुंबीयांच्या नावाचा आधार घेतला जातो. मात्र, जुन्नर-आंबेगाव पट्ट्यातील बिबट्याच्या दहशतीलाच एका कल्पक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची ओळख बनवले आहे. आळेफाटा-शिरूर मार्गावर सुरू झालेल्या ‘बिबट्या रसवंतीगृह’ या नावाने सध्या संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता निर्माण केली असून, उसाच्या रसासोबतच या नावाची गोडीही चर्चिली जात आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर या…

Read More

सभागृहाचे नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करा:सभागृहाच्या टिपू सुलतान नावावरून वादाचे संकेत‎

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला देण्यात आलेले ‘टिपू सुलतान’ हे नाव बदलण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून, याबाबत संघटनांनी जिल्हाधिकारी व स्थायी समिती सभापतींना निवेदनही िदले. सभागृहाला स्वराज्यरक्षक ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली आहे. निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून देण्यात आले. महापालकेमध्ये जून २०१२ रोजी सभा झाली होती. या…

Read More

गवळीशिवरा येथील पंचमी उत्सवाची सांगता

गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील श्री महारुद्र मारुती संस्थानच्या पंचमी महोत्सवाची सांगता गुरुवारी बोहड्याने झाली. या पंचमी उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली होती. पाच दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात झाली. यावर्षी पंचमी उत्सवाचे यजमान रामदास लक्ष्मण गवळी होते. या भाविकाने एक दिवस पंचमी उत्सवाचा खर्च करून नवस पूर्ण केला. तसेच लोकनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांना…

Read More

पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे:आर्ट ऑफ लिव्हिंगचा “अनसंग एवरीडे हीरोज’ पुरस्कार सोहळ्यात आवाहन; मान्यवर सहभागी‎

अकोल्यात पर्यावरण क्षेत्रात अनेक कार्य होणे आहे. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. उगवा गाव दत्तक घेऊन येथे जलस्त्रोतांचे खोलीकरण करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार आ . आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५ व्या स्थापना वर्षानिमित्त व गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या ७० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अकोल्यात…

Read More

मोहोळ- वळसंग मार्गासाठी 740 कोटी मंजूर:आमदार सुभाष देशमुखांच्या 10 वर्षांच्या पाठपुराव्याला यश, दळणवळणाला मिळणार गती‎

सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणाऱ्या एनएच-४६५ अंतर्गत मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)-वळसंग या ८१.३७ कि.मी. मार्गाच्या विकासासाठी ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी २०१४ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यावर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या…

Read More