Headlines

वारंवार वीज खंडितमुळे ग्रामस्थ संतप्त:रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

प्रतिनिधी | खुलताबाद ऐन उन्हाळ्यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दि.२७ महावितरण कार्यालयात धडक दिली. ग्रामस्थांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष अधिकच उफाळून आला….

Read More

कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरू:लासूर स्टेशनला १००% प्रतिसाद

प्रतिनिधी | लासूर स्टेशन लासूर स्टेशनसह गंगापूर तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या बेमुदत बंदला सोमवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. जाचक अटींचा निषेध केला. २७ तारखेपासून बेमुदत बंदला पाठिंबा दिला. योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा दिला. माफदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनतर्फे राज्यभर हा बंद पुकारण्यात आला आहे. देशातील असोसिएशननेही…

Read More

केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला निरोप:विद्यार्थ्यांच्या मनात आठवणी दाटून आल्या

प्रतिनिधी | शिल्लेगाव गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. शाळेचा शेवटचा वर्ग सातवी असल्याने विद्यार्थ्यांचा शाळेशी असलेला प्रवास एका टप्प्यावर थांबला. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरटं कधीही पुन्हा बांधता येईल, क्षितिजापलीकडे झेप घेण्याची…

Read More

कॉर्पोरेट जिहाद – दानिश शेखच्या मोबाइलमध्ये ‘क्राइम डिक्शनरी’:मोबाइल ‘फेस आयडी’ने उलगडणार गुपिते; तरुणींचे फोटो

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात धक्कादायक मानवी तस्करीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता असून संशयित आरोपी दानिश शेखच्या मोबाइलमुळे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि धर्मांतराच्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे हाती लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कडेकोट डिजिटल सुरक्षेत असलेल्या या मोबाइलमधून अशा काही करामती बाहेर आल्या आहेत की तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. दानिश शेख याने मोबाइलला सुरक्षेचे अभेद्य…

Read More

संभाजी महाराजांच्या स्मारकांसाठी 529.87 कोटींचा सुधारित आराखडा:बलिदान व समाधी स्थळ स्मारकाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर (ता. हवेली) येथील बलिदान स्थळ आणि वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळ स्मारकाच्या विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या विकास आराखड्यासाठी आता ५२९.८७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी झाला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी वेळेत पूर्ण व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नव्याने समाविष्ट कामे…

Read More

शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू:बढती-बदलीच्या नव्या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार, २८ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या बढती व बदलीच्या नव्या धोरणाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. कर्मचारी महासंघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ संयुक्त कृती समिती या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. शिक्षण मंडळ प्रशासन आणि सर्व कर्मचारी…

Read More

हंतोडा येथे वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित:नागरिकांनी रात्र जागून काढली, महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा गावात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते, त्यामुळे नागरिक दिवसभर उकाड्याने त्रस्त होते. सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी…

Read More

हिंगोली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात 53.95 लाखांचा अपहार:कनिष्ठ सहाय्यकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यकाने ५३.९५ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हिंगोलील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यक (लेखा) एस. सी. जावळे यांनी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून रक्कम काढण्याचा प्रयत्न…

Read More

हवामानातील बदलामुळे अमरावती जिल्ह्यात मोठा निर्णय:16.85 लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी 3 महिन्यांचे धान्य

हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील १६.८५ लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. हा एकत्रित धान्यपुरवठा एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी असेल. लाभार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार ३० जूनपर्यंत या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात अंत्योदय…

Read More

मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल:वरिष्ठ अधिकाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, जळगावच्या कंपनीतील संतापजनक प्रकार

नाशिकच्या अशोक खरात आणि आयटी कंपन्यांमधील अत्याचार प्रकरणांची शाई वाळते न वाळते, तोच जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील ‘अॅस्टोमो’ कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागणाऱ्या पीडितेकडे “मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल,” अशी निर्लज्ज मागणी करत या नराधम अधिकाऱ्याने तिचा छळ केला. या प्रकरणी धरणगाव…

Read More