आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी सरकारचा मोठा निर्णय:बचत गटाला व्यवसायासाठी 1 रुपया नाममात्र दराने मिळणार सरकारी पडीक जमीन
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना, विशेषतः त्यांच्या विधवा पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना विविध व्यवसाय आणि शेतीविषयक लागवडीसाठी शासकीय पडीक जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची अधिकृत घोषणा केली असून,…