Headlines

हिंगोलीत उन्हाचा पहिला बळी:30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, बसस्थानकावर सापडला होता मृतदेह; 'पोस्टमॉर्टम'मध्ये उष्माघाताचे निदान

हिंगोली येथील बसस्थानकावर सापडलेल्या मृतदेहावर शासकिय रुग्णालयात बुधवारी ता. १५ उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत वाढत्या तापमानाचा पहिला बळी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बसस्थानकावर एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आज पहाटेच पोलिस निरीक्षक संदीप मोदे,…

Read More

धनगरवाडी शिवारात शेतकऱ्याची आत्महत्या:न झालेल्या विहिरीचे पैसे भरण्याचा पोलिसांनी तगादा लावल्याचा नातेवाईकांचा आरोप

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्ायची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. शेतात विहीर नसतांनाही त्यासाठी उचलण्यात आलेले पैसे भरण्याचा तगादा पोलिसांकडून लावल्या जात असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. धनगरवाड येथील गोरख बबन पातळे (२५) यांना धनगरवाडी…

Read More

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क:प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण, जनजागृतीवर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने…

Read More

महाराष्ट्र उष्णतेने होरपळला:देगलूरच्या सुंदगीत देशातील उच्चांकी 47 अंश तापमानाची नोंद; अकोल्याचा पारा 44.2 अंशांवर

राज्यात उन्हाचा कडाका आता दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुंदगी गावात आज चक्क ४७ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. या तापमानासह सुंदगी हे आज देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. दुसरीकडे, विदर्भातील अकोला आणि अमरावतीतही सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून जनजीवनावर…

Read More

माणसे बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही:विचारांतील बदलामुळेच शिवसेनेवर मरणअवकळा, रावसाहेब दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत फेरबदलांच्या हालचाली सुरू असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच ‘कार्याध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य नेतृत्व बदलावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. “केवळ माणसं बदलून पक्ष वाढत नसतो, तुम्ही विचारांना मुठमाती दिली…

Read More

ST चालनीय उत्पन्न 11,475 कोटींवर:591 कोटींचा तोटा, 31 पैकी 8 विभाग नफ्यात; परिवहन मंत्र्यांचे तोटा कमी करण्याचे स्पष्ट निर्देश

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिलेत. उपलब्ध बस व मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करून दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः तोट्यातील विभागांची योग्य कारणमिमांसा करून त्यावर ठोस उपाययोजना राबवावी, असे ते म्हणालेत. आज महाराष्ट्र राज्य मार्ग…

Read More

तंत्रज्ञानापेक्षा माणुसकी मोठी:नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा डॉक्टरांना स्पष्ट संदेश; फडणवीस म्हणाले- प्रत्येकाला 5 किलोमीटर परिसरात आरोग्यसेवा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये द्वितीय दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नव्याने पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत मूल्यांवर भर दिला. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी डॉक्टरांमधील करुणा, प्रामाणिकपणा आणि नैतिकता यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश…

Read More

ही इतिहासाची पुनरावृत्ती:जे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केला, तेच आदित्य करत आहेत- संजय शिरसाट

शिवसेना ठाकरे गटात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. येत्या जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या नियुक्तीचा ठराव एकमताने मंजूर होण्याची चिन्हे असतानाच, राजकीय वर्तुळात या संभाव्य पदोन्नतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शिवसेनेचा…

Read More

कात्रज हादरले!:सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; सासरा अन् दिराविरुद्ध गुन्हा दाखल

कात्रज परिसरात छळाला कंटाळून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या सासऱ्यासह दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महिलेने अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र…

Read More

‘गजर विठ्ठलाचा’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध‎:महाराष्ट्रामध्ये पैठणनगरीचे विशेष धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व- अभिनेत्री अलका कुबल

संतपरंपरेची पावन परंपरा लाभलेल्या पैठणनगरीचे महाराष्ट्रात विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. संत एकनाथ महाराजांच्या भूमीत सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे मत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या षष्ठीनिमित्त तसेच वरुथिनी एकादशीच्या पावन पर्वावर नाथषष्ठी सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला…

Read More