Headlines

आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही!:ठाकरेंच्या 6 खासदारांची फूट आणि आत्रामांच्या दाव्यानंतर शरद पवारांचे बंडखोरीच्या चर्चेवर स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचेही खासदार फुटणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद…

Read More

नांदेडमध्ये 18 महिन्यात 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:175 आत्महत्या पात्र, 12 प्रकरण अपात्र; 30 प्रकरणे अजूनही चौकशीत

जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य संपता संपत नसल्याचे चित्र वारंवार पुढे येत आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या १८ महिन्यात तब्बल २१७ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. यातील केवळ १७५ आत्महत्या शासनाने पात्र ठरवले असून १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर चौकशीसाठी 30 प्रकरण प्रलंबित असून आत्तापर्यंत…

Read More

भोंदू अशोक खरातच्या पत्नीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर:सिन्नर फसवणूक एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन, शिर्डी प्रकरणात मात्र अद्याप दिलासा नाही

दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित प्रकरणात संशयित असलेल्या भोंदू कॅप्टन ऊर्फ अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातला नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात न्यायालयाने हा दिलासा दिला असून, एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन…

Read More

मृग नक्षत्र कोरडे:सांगोला तालुक्यात 30 हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या, 40 हजार हेक्टरचे नियोजन कोलमडले; फळबागांसह ऊस पिके संकटात‎

मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची पेरणीपूर्व तयारी . यंदा कृषी विभागाने तालुक्यात सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरणाचा आज अंतिम फैसला:राज्यातील सर्वात वेगवान खटला ठरण्याची शक्यता

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल आज, 25 जून रोजी जाहीर होणार आहे. हा खटला राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील आजवरचा सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालय आपला अंतिम फैसला सुनावणार…

Read More

दिवसभरात 32.7 मि.मी. नोंद; रविवारपर्यंत बरसण्याची शक्यता:ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह बरसला मुसळधार पाऊस‎

जिल्ह्यात गत २४ तासात ३२.७ अंश सेल्सिअस पाऊस पडल्याची नोंद बुधवारी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कुरणखेडसह अन्य काही ठिकाणी पावसाचे पाणीही साचले. दरम्यान जिल्ह्यात २८ जूनपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने २४ जून रोजी वर्तवली. ही परिस्थिती पेरणीसाठी पोषक असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे….

Read More

वैरागमध्ये ठाकरे गटाचे ‘जोडे मारो आंदोलन':शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याची मागणी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गद्दार खासदारांच्या निषेधार्थ “जोडे मारो आंदोलन” करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण व विनाअट कर्जमाफी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफीचा शासन निर्णय (जीआर) तातडीने…

Read More

आई म्हणते, ‘माझी किडनी घे’; पण 5 लाखांअभावी थांबले जीवनदान:खंडाळ्यातील कारभारी मगर यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी

तालुक्यातील खंडाळा येथील कारभारी पांडुरंग मगर (४५) यांच्यासमोर सध्या जीवन-मरणाचा अत्यंत खडतर संघर्ष उभा राहिला आहे. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) पूर्णपणे निकामी झाली आहेत. त्यांचे आयुष्य सध्या डायलिसिसवर अवलंबून आहे. डॉक्टरांनी केवळ किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हाच कारभारी यांना वाचवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा या कठीण प्रसंगी एका आईचे वात्सल्य धावून आले आहे….

Read More

भैताणे दिगर येथील गायरानावर सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांकडून विरोध:सरपंच, सदस्यांसह आदिवासी बांधवांतर्फे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत तालुक्यातील भैताणे दिगर येथील गायरान जमीन सौर प्रकल्पासाठी देण्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी बांधवांनी कडाडून विरोध केला आहे. गायरान क्षेत्र गुरांच्या चरण्यासाठी, डोंगरादेव व इतर धार्मिक तसेच सार्वजन . भैताणे दिगरच्या सरपंच दीपाली कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी काश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे आणि गटविकास अधिकारी रमेश वाघ…

Read More

जरंडी परिसरामध्ये ढगफुटीसदृश पाऊस‎:सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सोयगाव-बनोटी-चाळीसगाव राज्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम‎

तालुक्यातील जरंडीसह परिसरात बुधवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला. दोन तासांत कोसळलेल्या पावसामुळे गावालगत असलेल्या खडकी नदीला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पहिलाच मोठा पूर आला. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील पूल वाहून गेला. परिणामी, या मार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प झाली होती. सोयगाव-चाळीसगावचा संपर्क पूर्णपणे तुटला…

Read More